शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:57 IST

जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.हे अभ्यास दौरे महिला बालकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिला बालकल्याण विभागातर्फे कर्नाटक येथे अभ्यास दौरा जाणार आहे. हा दौरा फक्त महिला सदस्यांसाठी आहे. तर पाणी पुरवठा स्वच्छता मिशनतर्फे कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी दौरा काढण्यात येणार आहे. यात सर्व सदस्यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण विभागाचा दौरा आटोपल्यावर सर्व सदस्य कोल्हापूरला पोहचून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा दौरा करणार आहे. याकरिता आवश्यक तयारी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या कक्षात अधिकाऱ्यांची मॅराथॉन बैठक झाली.पण जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती आहे. टँकरमध्येही वाढ करण्यात आली नाही. मान्सून लांबला अूसन टंचाईचे अद्याप काम पूर्ण झाले नाही. टंचाईवर विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मागील सर्वसाधारण अध्यक्षांनी दिले होते. महिनाभराचा कालावधी होत असताना अद्याप बैठक झाली नाही. दुष्काळी भागाचा दौरा केला नाही. फक्त बोअरवेल होत नसल्याची ओरड होत आहे. टंचाईच्या इतर कामावर सदस्य शब्दच काढत नाही. मान्सून लांबल्याने ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होणार असल्याचे सांगण्यात येते. अशातच जिल्हा परिषदेतील संपूर्ण सदस्य अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. विरोधी पक्षांनी या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.दुष्काळाच्या परिस्थितीत अभ्यास दौरे काढणे चुकीचे आहे. यासंदर्भात आमच्या सदस्यांशी चर्चा करून, या दौऱ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊ.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, काँग्रेसदुष्काळाची भीषणता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे दौरे करणे गरजेचे आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आहे. शाळा सुरू होत आहेत. पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. असा परिस्थितीत दौरे करण्यापेक्षा दौऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावे. मला या दौऱ्याबद्दल कल्पना नाही आणि मी जाणारही नाही.चंद्रशेखर चिखले, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा असे दौरे काढत असेल, तर दौऱ्याला आमचा विरोध राहील. आम्ही शिवसेनेच्या सर्व सदस्यांना दौऱ्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणार.संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :droughtदुष्काळnagpurनागपूर