शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:57 IST

जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्काळाचा आढावा नाही, टंचाईचे योग्य नियोजन नाही, खरीप हंगाम तोंडावर असताना बैठका नाही. ग्रामीण भागातील जनता दुष्काळामुळे मेटाकुटीस आली असतानाही, दौरेसुद्धा केले जात नाही. जिल्ह्यात निर्माण झालेल्या अशा भीषण परिस्थितीत आता जि.प.च्या सदस्यांचे अभ्यास दौरे काढले जात आहे. त्याची चर्चा आता रंगायला लागली आहे. जिल्ह्याकडे पाठ आणि अभ्यास दौऱ्याचा कसला थाट, अशी ओरड आता ग्रामीण जनतेतून होऊ लागली आहे.हे अभ्यास दौरे महिला बालकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिला बालकल्याण विभागातर्फे कर्नाटक येथे अभ्यास दौरा जाणार आहे. हा दौरा फक्त महिला सदस्यांसाठी आहे. तर पाणी पुरवठा स्वच्छता मिशनतर्फे कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी दौरा काढण्यात येणार आहे. यात सर्व सदस्यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण विभागाचा दौरा आटोपल्यावर सर्व सदस्य कोल्हापूरला पोहचून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा दौरा करणार आहे. याकरिता आवश्यक तयारी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या कक्षात अधिकाऱ्यांची मॅराथॉन बैठक झाली.पण जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती आहे. टँकरमध्येही वाढ करण्यात आली नाही. मान्सून लांबला अूसन टंचाईचे अद्याप काम पूर्ण झाले नाही. टंचाईवर विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मागील सर्वसाधारण अध्यक्षांनी दिले होते. महिनाभराचा कालावधी होत असताना अद्याप बैठक झाली नाही. दुष्काळी भागाचा दौरा केला नाही. फक्त बोअरवेल होत नसल्याची ओरड होत आहे. टंचाईच्या इतर कामावर सदस्य शब्दच काढत नाही. मान्सून लांबल्याने ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होणार असल्याचे सांगण्यात येते. अशातच जिल्हा परिषदेतील संपूर्ण सदस्य अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. विरोधी पक्षांनी या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.दुष्काळाच्या परिस्थितीत अभ्यास दौरे काढणे चुकीचे आहे. यासंदर्भात आमच्या सदस्यांशी चर्चा करून, या दौऱ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊ.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, काँग्रेसदुष्काळाची भीषणता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे दौरे करणे गरजेचे आहे. शेतीचा हंगाम तोंडावर आहे. शाळा सुरू होत आहेत. पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. असा परिस्थितीत दौरे करण्यापेक्षा दौऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावे. मला या दौऱ्याबद्दल कल्पना नाही आणि मी जाणारही नाही.चंद्रशेखर चिखले, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा असे दौरे काढत असेल, तर दौऱ्याला आमचा विरोध राहील. आम्ही शिवसेनेच्या सर्व सदस्यांना दौऱ्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणार.संदीप इटकेलवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :droughtदुष्काळnagpurनागपूर