शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत दिग्गजांचे पानिपत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:59 IST

रामटेक लोकसभा क्षेत्राचे निकाल सुरुवातीपासूनच धक्कादायक राहिले आहेत. रामटेकच्या मतदारांनी भाई बर्धन, बनवारीलाल पुरोहित, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांना नापसंती दर्शविली आहे.

ठळक मुद्देबर्धन, पुरोहित, देशमुख, जिचकार यांना मतदारांनी नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्राचे निकाल सुरुवातीपासूनच धक्कादायक राहिले आहेत. जतिराम बर्वे, अमृतराव सोनार, पी.व्ही.नरसिंहराव, दत्ता मेघे या सारख्या दिग्गजांना डोक्यावर घेणाऱ्या रामटेकच्या मतदारांनी भाई बर्धन, बनवारीलाल पुरोहित, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांना नापसंती दर्शविली आहे. तेव्हाची राजकीय समीकरणे हेही या दिग्गजांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते.१९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून कृष्णराव देशमुख तर कृष्णराव यावलकर आणि बी. टी. भोसले हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यात कृष्णराव देशमुख १ लाख ६६ हजार १२३ मते घेत ६३ हजार ६७३ मतांनी विजयी झाले. कृष्णराव यावलकर यांना १ लाख २ हजार ४५० मते पडली.१९६२ मध्ये काँग्रेसतर्फे माधवराव पाटील, शेतकरी कामगार पक्षातर्फे बी.टी. भोसले आणि अपक्ष उमेदवार नारायण हरकरे यांनी निवडणूक लढविली. यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. १९६७ मध्ये काँग्रेसचे अमृत सोनार हे १ लाख ५ हजार ३४९ मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात रिपब्लिकनचे आर.एन. पाटील, जनसंघाचे एस.व्ही. शेलोकार आणि अपक्ष उमेदवार म्हणून आनंदराव कळमकर मैदानात होते. १९७१ मध्ये पुन्हा अमृत सोनार यांनी निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आनंदराव कळमकर तसेच अपक्ष उमेदवार इंद्रराज हसराम, श्यामराव वंजारकर आणि कवडू उमरे हे होते. १९५७ ते १९७१ या कालावधीत झालेल्या निवडणुकीत बी.टी.भोसले, आनंदराव कळमकर यांनी दोनदा निवडणूक लढविली. मात्र त्यांना मतदारांनी नाकारले.१९७४ मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पोटनिवडणूक झाली. यात काँग्रेसला धक्का बसला. नाग विदर्भ समितीकडून राम हेडाऊ, भाकपतर्फे ए.बी. बर्धन आणि आनंदराव कळमकर यांनी निवडणूक लढविली. त्यातून पहिल्यांदा या मतदारसंघातून गैरकाँग्रेसी उमेदवाराचा विजय झाला. नाग विदर्भ समितीचे राम हेडाऊ यांनी २ लाख १९ हजार ८६० मते घेत आनंदराव कळमकर यांचा १ लाख ३१ हजार १२८ मतांनी पराभव केला. कळमकर यांना ८८ हजार ७३२ मते पडली. १९७७ ला तत्कालीन खासदार राम हेडाऊ यांनी पुन्हा निवडणूक लढविली. मात्र काँग्रेसच्या जतिराम बर्वे यांनी १ लाख ९६ हजार ९७७ मते घेत ४२ हजार ९४९ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. १९८० मध्ये पुन्हा जतिराम बर्वे हे विजयी झाले. १९८४ मध्ये काँग्रेसच्या पी.व्ही.नरसिंहराव यांनी शंकरराव गेडाम यांचा पराभव केला. १९८९ मध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी जनता दलाचे पांडुरंग हजारे, बसपाचे मा.म. देशमुख यांचा पराभव केला.१९९१च्या निवडणुकीत भाजपकडून पांडुरंग हजारे यांनी निवडणूक लढविली. मात्र काँग्रेसच्या तेजसिंहराव भोसले यांनी १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी त्यांचा पराभव केला. १९९६ मध्ये दिग्गज उमेदवारांनी या मतदारसंघातून नशीब आजमावले. त्यात काँग्रेसचे दत्ता मेघे, शिवसेनेचे प्रकाश जाधव, जनता दलाचे गोविंदराव वंजारी, अपक्ष कयमुद्दीन पठाण यांचा समावेश होता. यात काँग्रेसचे दत्ता मेघे हे विजयी झाले.१९९८ मध्ये शिवसेनेच्या अशोक गुजर यांचा काँग्रेसच्या चित्रलेखा भोसले यांनी ६७ हजार ३८ मतांनी पराभव केला. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला पहिल्यांदा धक्का बसला तो १९९९ मध्ये. शिवसेनेकडून सुबोध मोहिते, काँग्रेसकडून बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांडुरंग हजारे, बसपतर्फे अशोक इंगळे आणि गोंडवाना गणतंत्र पक्षातर्फे राजश्री देवी हे निवडणूक रिंगणात होते. सुबोध मोहिते हे ११ हजार ६८९ मतांनी विजयी झाले. यानंतर २००४ मध्ये पुन्हा सुबोध मोहिते यांनी निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला. २००९ मध्ये मुकुल वासनिक (काँग्रेस), कृपाल तुमाने (शिवसेना), प्रकाश टेंभुर्णे (बसपा), सुलेखा कुंभारे (बरिएमं), माया चवरे (सपा) यांच्यासह अपक्ष उमेदवारांच्या भरमार होती. त्यात मुकुल वासनिक हे १६ हजार ७०१ मतांनी विजयी झाले.२०१४ मध्ये सेनेने तुमाने यांना पुन्हा संधी दिली. त्यांनी काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा पराभव केला.दोन माजी मंत्र्यांना धक्का२००७ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून प्रकाश जाधव तर काँग्रेसकडून माजी मंत्री सुबोध मोहिते, अपक्ष उमेदवार म्हणून माजी मंत्री रणजित देशमुख हे निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रकाश जाधव यांनी दोन माजी मंत्र्यांचा पराभव केला. त्यांच्या विजयाने रामटेक लोकसभा क्षेत्रात शिवसेनेची हॅट्ट्रिक झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक