शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

हॉटेल, लग्नकार्यातून शिल्लक अन्न जाते कचऱ्यात; भुकेलेल्यांपर्यंत पोहचणाऱ्या हातांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 20:46 IST

Nagpur News मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे.

ठळक मुद्देभूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्य

नागपूर : भुकेल्यांच्या इंडेक्समध्ये देशाचे स्थान चिंताजनक असताना मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे. शहरातील हॉटेलमध्ये उरलेले अन्न महापालिकेच्या कचरा गाडीतच जाते.

- शहरात ५ हजारांवर हॉटेल

शहरात छोटे-मोठे असे ५००० वर हॉटेल आहे. मोठ्या हॉटेलची संख्या जवळपास ५०० आहे. मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या संख्येनुसार नियोजन केले जाते किंवा ऑर्डरनुसार अन्न बनविले जाते. त्यामुळे फार कमी अन्न उरते. तेही नियमित अन्न उरत नाही. उरलेले अन्न घेऊन जाणाऱ्या संस्था फार नसल्यामुळे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीतच अन्न टाकावे लागते. छोट्या हॉटेल चालकांचा व्यवसायही लिमिटेड असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार अन्न शिजविले जाते. त्यामुळे फार अन्न उरत नसल्याचे हॉटेल व्यावसायिक कुणाल नितनवरे यांनी सांगितले.

- ५०० मंगल कार्यालये

सर्वात जास्त अन्नाची नासाडी ही लग्न कार्यात किंवा तेरवी, चौदावीच्या कार्यक्रमात अथवा महाप्रसादासारख्या मोठमोठ्या आयोजनात होते. शहरात हॉटेल व लॉन मिळून ५०० च्या जवळपास मंगल कार्यालये आहेत. मंगल कार्यालयाचा व्यवसाय हा सीझनेबल आहे. लग्नसोहळ्याच्या सीझनमध्ये अन्न उतरते. पण कॅटरिंगवाले हे अन्न घेऊन जात असल्याचे डांगे सेलिब्रेशन लॉनचे संचालक शिशुपाल डांगे यांनी सांगितले. आम्हाला लग्नकार्यात मिळालेल्या ऑर्डरनुसार आम्ही अन्न शिजवितो. आमचा हिशेब प्लेटनुसार असतो. अशात काही प्लेट अन्न उरले तर ज्यांच्याघरचे लग्न असेल त्यांना देतो. त्यांनी उरलेले अन्न नाही घेतल्यास आम्ही ताजबाग व जिथे भिकारी जास्त असतात. तिथे वाटप करीत असल्याचे नेरकर कॅटरर्सचे संचालक शरद नेरकर यांनी सांगितले.

 

- उरलेले अन्न भुकेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 

आमचे शहरात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ३०० व्हॉलेंटियर्स आहेत. आम्ही शहरातील काही हॉटेल्ससोबत व मंगल कार्यालयांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून आम्हाला कॉल आला की आम्ही उरलेले अन्न गोळा करतो. ते अन्न आम्ही अनाथालय व स्लम वस्तीमध्ये वितरीत करतो. कॅटरिंग व्यावसायिकांकडून आम्हाला जास्त कॉल येतात. शहरातील हॉटेल व लग्नसोहळे लक्षात घेता त्यात उरलेले अन्न कलेक्ट करणाऱ्या संस्था फार कमी आहेत. त्या वाढणे गरजेचे आहे.

निश्चय शेंडे, समन्वयक, रॉबिनहूड आर्मी

टॅग्स :foodअन्न