शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हॉटेल, लग्नकार्यातून शिल्लक अन्न जाते कचऱ्यात; भुकेलेल्यांपर्यंत पोहचणाऱ्या हातांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 20:46 IST

Nagpur News मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे.

ठळक मुद्देभूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्य

नागपूर : भुकेल्यांच्या इंडेक्समध्ये देशाचे स्थान चिंताजनक असताना मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे. शहरातील हॉटेलमध्ये उरलेले अन्न महापालिकेच्या कचरा गाडीतच जाते.

- शहरात ५ हजारांवर हॉटेल

शहरात छोटे-मोठे असे ५००० वर हॉटेल आहे. मोठ्या हॉटेलची संख्या जवळपास ५०० आहे. मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या संख्येनुसार नियोजन केले जाते किंवा ऑर्डरनुसार अन्न बनविले जाते. त्यामुळे फार कमी अन्न उरते. तेही नियमित अन्न उरत नाही. उरलेले अन्न घेऊन जाणाऱ्या संस्था फार नसल्यामुळे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीतच अन्न टाकावे लागते. छोट्या हॉटेल चालकांचा व्यवसायही लिमिटेड असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार अन्न शिजविले जाते. त्यामुळे फार अन्न उरत नसल्याचे हॉटेल व्यावसायिक कुणाल नितनवरे यांनी सांगितले.

- ५०० मंगल कार्यालये

सर्वात जास्त अन्नाची नासाडी ही लग्न कार्यात किंवा तेरवी, चौदावीच्या कार्यक्रमात अथवा महाप्रसादासारख्या मोठमोठ्या आयोजनात होते. शहरात हॉटेल व लॉन मिळून ५०० च्या जवळपास मंगल कार्यालये आहेत. मंगल कार्यालयाचा व्यवसाय हा सीझनेबल आहे. लग्नसोहळ्याच्या सीझनमध्ये अन्न उतरते. पण कॅटरिंगवाले हे अन्न घेऊन जात असल्याचे डांगे सेलिब्रेशन लॉनचे संचालक शिशुपाल डांगे यांनी सांगितले. आम्हाला लग्नकार्यात मिळालेल्या ऑर्डरनुसार आम्ही अन्न शिजवितो. आमचा हिशेब प्लेटनुसार असतो. अशात काही प्लेट अन्न उरले तर ज्यांच्याघरचे लग्न असेल त्यांना देतो. त्यांनी उरलेले अन्न नाही घेतल्यास आम्ही ताजबाग व जिथे भिकारी जास्त असतात. तिथे वाटप करीत असल्याचे नेरकर कॅटरर्सचे संचालक शरद नेरकर यांनी सांगितले.

 

- उरलेले अन्न भुकेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 

आमचे शहरात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ३०० व्हॉलेंटियर्स आहेत. आम्ही शहरातील काही हॉटेल्ससोबत व मंगल कार्यालयांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून आम्हाला कॉल आला की आम्ही उरलेले अन्न गोळा करतो. ते अन्न आम्ही अनाथालय व स्लम वस्तीमध्ये वितरीत करतो. कॅटरिंग व्यावसायिकांकडून आम्हाला जास्त कॉल येतात. शहरातील हॉटेल व लग्नसोहळे लक्षात घेता त्यात उरलेले अन्न कलेक्ट करणाऱ्या संस्था फार कमी आहेत. त्या वाढणे गरजेचे आहे.

निश्चय शेंडे, समन्वयक, रॉबिनहूड आर्मी

टॅग्स :foodअन्न