शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश

By नरेश डोंगरे | Updated: October 31, 2023 22:40 IST

मराठा आंदोलन, राज्यातील सर्व रेल्वेस्थानके, रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर

नागपूर : तुमचे स्वत:चे लग्न असेल तरच तुम्हाला सुटी मिळेल. हे आणि आणखी एका कारणास्तव तुम्हाला सुटी मिळेल. बाकी सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुटीवर असाल तर ताबडतोब कर्तव्यावर पोहचा, असे कडक आदेश सोमवारी मध्यरात्री रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दला (आरपीएफ)च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या सोबतच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, डोळ्यात तेल घालून राज्यातील सर्व रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर अतिशय सतर्कतेने कर्तव्य बजावा, असेही आदेश जारी करण्यात आले आहे.

आरक्षणाच्या संबंधाने अद्याप तोडगा न निघाल्याने राज्यातील मराठा आंदोलन आता जागोजागी चिघळू लागले आहे. मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे ठिकठिकाणी नेत्यांना घेराव, कार्यक्रमात घोषणाबाजी, बैठका उधळून लावणे, नेत्यांना गावबंदी, कार्यक्रम बंदी करण्यात आली असून काही नेत्यांच्या घरांची जाळपोळ, दगडफेक, टायर जाळणे, घोषणाबाजी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडही सुरू आहे. आंदोलकांची नजर रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्यांवरही जाऊ शकते. त्यामुळे भलतेच वळण मिळू शकते, असे संकेत मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे सुरक्षेशी संबंधित राज्यातील यंत्रणा सोमवारी अलर्ट मोडवर आली आहे.

सोमवारी मध्यरात्री मुंबई मुख्यालयातून राज्यातील सर्व रेल्वे पोलिसांना खबरदारीचे आदेश देण्यात आले. 'तुमच्या सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तुमचे (नोकरीत असलेल्यांचे) स्वत:चे लग्न असेल किंवा तुम्ही आजारी असाल तरच तुमची सुटी मंजूर समजा. दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव तुम्हाला सुटी मिळणार नाही. अगदी साप्ताहिक रजा (विकली ऑफ)सुद्धा रद्द करण्यात आल्या असून, तुम्ही यापूर्वी विविध कारणाने रजा मंजूर करून घेतली असेल तर ती रद्द झाल्याचे समजून ताबडतोब कर्तव्यावर परता', असे आदेश रेल्वेे पोलिसांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज पहाटेपासून रेल्वेस्थानकाच्या आत-बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

'त्यांची' उडाली तारांबळ, अनेकांचा हिरमोड

सुट्या रद्द झाल्याच्या आदेशासोबतच सर्वांनी अत्यंत सतर्कपणे रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर कर्तव्य बजावण्याचे आदेश सोमवारी मध्यरात्रीपासून जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फिरत असल्याने काही जणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवाळी तोंडावर असल्याने काही जण दूरदूरवरच्या आपल्या गावात गेल्याने त्यांची कर्तव्यावर हजर राहण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

आधी लगिन कोंढाण्याचे !

आणिबाणीची स्थिती निर्माण झाल्यामुळे घरात मुलगा रायबाचे लग्नाचे शूभकार्य असूनही ते बाजुला सारत 'आधी लगीन कोंढाण्याचे' अशी घोषणा बहाद्दर योद्धे तानाजी मालुसरे यांनी केली होती. ते साल होते १६७० चे. आता राज्यात मराठ्यांचे मोठे आंदोलन सर्वत्र सुरू आहे. हे आंदोलन चिघळत असल्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गढ अबाधित राखण्याचे आव्हान ठाकले आहे. त्याचमुळे पोलिसांच्या सर्व सुट्टया रद्द् करण्यात आल्या असून, तुमचे महत्वाचे काम बाजुला ठेवा, नंतर करा, आधी कर्तव्यावर या, असे आवाहन वजा आदेश सुरक्षा व्यवस्थेचा किल्ला लढविणाऱ्यांना पोलिसांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणnagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे