शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कायदा दुरुस्ती ही निवडणूक स्थगितीचे कारण ठरू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:55 IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती व्हायची आहे म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यावर स्थगिती दिली जाऊ शकत नाही असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे नागपूर, अकोला, वाशीम व नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्यघटनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक घेणे आवश्यक आहे. निवडणूक कोणत्याही कारणामुळे बेमुदत काळाकरिता पुढे ढकलली जाऊ शकत नाही. तसेच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यास प्रशासकाची नियुक्ती करायला पाहिजे असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी होणार असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या अंतरिम स्थगनादेशामुळे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत. या न्यायालयामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला आणि नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. त्यामध्ये न्यायालयाने या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यासोबत एकूण पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत.राज्य निवडणूक आयोगाचे वकील अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी गेल्या सोमवारी उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सादर केला व निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. परंतु, उच्च न्यायालयाने सध्याच्या परिस्थितीत आयोगाची विनंती मान्य करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आणि प्रकरणावरील सुनावणी २९ जुलैपर्यंत तहकूब केली.असा आहे वादकायद्याच्या कलम १२(२)(सी) मध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कायद्यात दुरुस्ती होतपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांमध्ये शिवकुमार यादव व इतरांचा समावेश आहे.असा आहे वादकायद्याच्या कलम १२(२)(सी) मध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कायद्यात दुरुस्ती होतपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांमध्ये शिवकुमार यादव व इतरांचा समावेश आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकnagpurनागपूर