शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

अन् सायकलचे पैसे मिळताच फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:06 IST

रेल्वे स्टेशनवरून हिमाचलकडे जाण्यास गाडी मिळाल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा हैदराबादहून प्रवास करण्यासाठी घेतलेल्या नव्या सायकली सोडून जाण्याचे दु:ख अधिक होते. मात्र पर्याय नव्हता कारण पुन्हा सायकलने प्रवास करण्याचे त्राण अंगात नव्हते. जड अंत:करणाने सायकली सोडून ते गाडीत बसण्यासाठी निघाले. इतक्यात मागावून कुणीतरी हाक दिली आणि सायकली घेतल्याचे सांगत हातावर रोकड ठेवली. सायकल जाण्याचे दु:ख क्षणात विरले आणि चेहऱ्यावर हास्य उमटले.

ठळक मुद्देहिमाचलला जाणाऱ्या तरुणांची मदत : वेदनेवर फुंकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनवरून हिमाचलकडे जाण्यास गाडी मिळाल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा हैदराबादहून प्रवास करण्यासाठी घेतलेल्या नव्या सायकली सोडून जाण्याचे दु:ख अधिक होते. मात्र पर्याय नव्हता कारण पुन्हा सायकलने प्रवास करण्याचे त्राण अंगात नव्हते. जड अंत:करणाने सायकली सोडून ते गाडीत बसण्यासाठी निघाले. इतक्यात मागावून कुणीतरी हाक दिली आणि सायकली घेतल्याचे सांगत हातावर रोकड ठेवली. सायकल जाण्याचे दु:ख क्षणात विरले आणि चेहऱ्यावर हास्य उमटले.नागपूर रेल्वे स्टेशनवरचा हा प्रसंग. शोएब मेमन या तरुणाच्या पुढाकाराने अ‍ॅड. रेखा बाराहाते व नीलेश यांनी या तीन मित्रांच्या तीन सायकली मदत म्हणून विकत घेतल्या. याबाबत अधिक माहिती म्हणजे, हैदराबाद येथे कंपनीत कामाला असलेले हिमाचल प्रदेश व उत्तराखंडचे प्रेम कुमार, विवेक व अजय कुमार हे तीन तरुण ८ मे रोजी सायकलने निघाले. त्यांनी वेळेवर नवीन सायकल घेतल्या. आठवडाभर प्रवास करीत ते १५ रोजी नागपूरला पोहचले. यांच्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. नागपूर स्टेशनवरून उधमपूरसाठी ट्रेन जाणार होती. ही गाडी उत्तराखंड, हिमाचल होत जाते. याबाबत पांजरी टोल नाक्यावर त्यांना माहिती मिळाली. सायकलने पुन्हा प्रवास करण्याची हिंमत होत नसल्याने त्यांनी ट्रेनने जाण्याचा विचार केला व नोंद केली. मात्र सायकल नेता येत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. त्यांना सायकली येथेच सोडून जावे लागणार होते. पांजरी नाक्यावर स्थलांतरित मजुरांना भोजन, वैद्यकीय सुविधा व सर्व प्रकारची मदत देणाऱ्या ‘टूगेदर वुई कॅन’ ग्रुपच्या शोएब मेमन यांनी तरुणांची व्यथा ओळखत नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या सायकली ठेवल्या व तेवढी किंमत दिली. यामुळे त्या तरुणांना एक समाधान मिळाले आणि ते आनंदाने आपल्या प्रवासाला लागले.वडील जिवंत असल्याचे कळताच ढसाढसा रडलेशोएब यांनी वेदनांच्या अनेक कथा ‘लोकमत’शी बोलताना उलगडल्या. वाराणशी येथील राजेंद्र शर्मा नामक ज्येष्ठ व्यक्ती पिंडदान करायला कन्याकुमारीला गेले होते. अचानक लॉकडाऊन लागला आणि ते अडकले. ते मधुमेह व टीबीचे रुग्ण होते. रेल्वेस्थानकावर रात्री झोपले असता चोरट्यानी त्यांचा मोबाईल व पैसे चोरून नेले. २५ मार्चची ही घटना. जवळ पैसे नाहीत आणि कुणाचा संपर्क आठवत नव्हता. कधी पायी तर कधी एखाद्या वाहनाची मदत घेत ते २९ एप्रिल रोजी नागपूरला पोहचले. या काळात त्यांना कुठेही मधुमेह व टीबीची औषध मिळाली नसल्याने त्यांची अवस्था नाजूक झाली होती. शोएब व त्यांच्या सहकार्यांनी आधी त्यांच्या औषधांची व्यवस्था केली. नंतर त्यांनी सांगितलेल्या पत्त्याजवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधून घरच्यांना माहिती देण्यास सांगितले. इतक्या दिवस कुठलाही संपर्क न झाल्याने वडील गमावल्याच्या दु:खात असलेल्या कुटुंबाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अर्धा तास मुलगा व कुटुंबाशी बोलताना दोन्हीकडे अश्रूंची वाट मोकळी झाली. हे दृश्य आम्हालाही भावुक करून गेल्याचे शोएब यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCyclingसायकलिंग