शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

भूमिपुत्रांनो आता गुलामगिरी नको!

By admin | Updated: May 6, 2017 02:33 IST

आज खेड्यातील तरुण शहरात स्थलांतरित होत आहे. पुढेही अशीच स्थिती कायम राहिली, तर गावातील शेती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुभाष पाळेकर : एकरी १२ लाखांच्या उत्पन्नासाठी ‘पंचस्तरीय मॉडेल’, तरुणांनो गावाकडे परत या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज खेड्यातील तरुण शहरात स्थलांतरित होत आहे. पुढेही अशीच स्थिती कायम राहिली, तर गावातील शेती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी ज्याला राजा म्हटले जात होते, तो शेतकरी आज भिकारी झाला आहे, आणि भिकारी हा राजा झाला आहे. या असमान व्यवस्थेत शेतीची प्रतिष्ठा हरविली आहे. त्यामुळे गावातील तरुण हा ३०० रुपये मजुरीत शेतीत काम करायला तयार नाही, मात्र तोच तरुण केवळ १५० रुपये मजुरीत कारखान्यात आनंदाने राबत आहे. कारण नोकरी ही प्रतिष्ठेची समजली जात आहे. मात्र आता तुम्ही केवळ एक एकर शेतीत वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पादन घेऊ शकता. त्यासाठी ‘पंचस्तरीय’ फळबाग मॉडेल’ तयार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो तुम्हाला आता कारखान्यात दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची गरज नाही, स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या खेड्याकडे परत या, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी भूमिपुत्रांना केले. ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या विषयावर मागील तीन दिवसांपासून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात शुक्रवारी ते बोलत होते. या शिबिराच्या शेवटच्या आणि तिसऱ्या दिवशी पाळेकर यांनी शेतकऱ्यांना समृद्घीचा मंत्र देत सर्वांसमोर ‘पंचस्तरीय’ फळबाग मॉडेल’ सादर केले. यावेळी पाळेकर यांनी शेतकऱ्यांना केवळ मॉडेलच सांगितले नाही, तर ते अमलात कसे आणावे, हेही अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेत पटवून दिले. त्यांनी आपल्या या ‘मॉडेल’ मध्ये प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या प्रमुख चार फळझाडांचा उपयोग करून त्यात डाळिंब, सीताफळ, केळी, पपई, हातगा, सिल्वर ओक, काळी मिरी, तूर, अंबाडी, बाजरी, चवळी, मटकी, वाल, मिरची गावरान, सिमला मिरची व झेंडू यांचाही समावेश केला. दरम्यान त्यांनी फळझाडांच्या लागवडीपासून तर त्यांची मशागत आणि शेवटी उत्पादनापर्यंत शेतकऱ्यांना ‘पंचस्तरीय फळबाग मॉडेल’ पटवून दिले. शिबिराचा समारोप मागील तीन दिवसांपासून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात व आंधप्रदेशातील सुमारे एक हजार शेतकरी सहभागी झाले होते. यात पुरुषांसह महिला आणि तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सुभाष पाळेकर यांनी मागील तीन दिवस सतत १०-१० तास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ चे तंत्र आणि मंत्र सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद झळकत होता. शिवाय प्रत्येकजण समाधान व्यक्त करीत होता. विदर्भात ‘स्ट्रॉबेरी’ कृषी विद्यापीठे ‘स्ट्रॉबेरी’ चे उत्पादन केवळ महाबळेश्वर येथेच होऊ शकते, असा दावा करतात. मात्र ते पूर्णत: खोटे बोलत असून, ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’तून विदर्भात सुद्धा ‘स्ट्रॉबेरी’ चे भरघोस उत्पादन होऊ शकते, असे यावेळी पाळेकर यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर यावर आपण स्वत: संशोधन करू न, नागपूर जिल्ह्यात एक यशस्वी प्रयोग सुद्धा केला असल्याचे ते म्हणाले. ‘स्ट्रॉबेरी’ हे थंड आणि सावलीत येणारे पीक आहे. त्यामुळे विदर्भातील ४७ ते ४८ अंश सेल्सिअसच्या तापमानात ते टिकूच शकत नाही, असा कृषी विद्यापीठांचा दावा हा फोल असून, ते शेतकऱ्यांना भ्रमित करीत असल्याचेही पाळेकर यांनी यावेळी सांगितले. तीन एकरात १९ लाखांचे उत्पादन सांगली जिल्ह्यातील खारसिंग येथील तरुण शेतकरी दत्ताजी कारे यांच्याकडे केवळ तीन एकर शेती असून, त्यात संपूर्ण द्राक्षाची बाग आहे. यावेळी ते म्हणाले, आपण पूर्वी रासायनिक शेती करीत होतो. मात्र त्यावेळी द्राक्ष उत्पादनासाठी एकरी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत होता. द्राक्षाच्या बागेला वर्षभर महागड्या रासायनिक खताचा डोज द्यावा लागत होता आणि रासायनिक खत दिले की, फळांवर रोगांचा प्रादुर्भाव होत होता. तो नियंत्रित करण्यासाठी वर्षातील तब्बल ८० ते ९० दिवस विषारी औषधांची फवारणी करावी लागत होती. या खर्चाने अर्धे कंबरडे मोडत होते. यानंतर पिकविलेल्या द्राक्षांना चांगला भाव मिळाला नाही, तर उत्पादन खर्चही निघत नव्हता. यातच मागील तीन वर्षापूर्वी ‘नैसर्गिक शेती’चा मार्ग सापडला. आता तोच उत्पादन खर्च एकरी एक ते दीड लाखांवरून केवळ १० ते १५ हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे. शिवाय द्राक्षांच्या दर्जात प्रचंड सुधारणा झाली आहे. सोबतच रासायनिक द्राक्षाच्या तुलनेत या द्राक्षाला प्रचंड मागणी वाढत असून, दुप्पट भाव मिळत आहे. यामुळे मागील वर्षी तीन एकरातील द्राक्ष बागेतून १९ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. -दत्ताजी कोरे, खारसिंग, सांगली. कृषी सेवा केंद्र बंद करून नैसर्गिक शेतीचा मार्ग पकडला आपल्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. शिवाय कृषी सेवा केंद्र होते. मागील २००९ पर्यंत कृषी सेवा केंद्र चालविले. स्वत:चेच कृषी सेवा केंद्र असल्याने शेतीत रासायनिक खते आणि विषारी औषधीचा भडीमार सुरू होता. मात्र काहीच दिवसांत त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. आपण वारंवार आजारी पडत होतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंता करीत होते. शेवटी कृषी सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय