शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
2
विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
3
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
4
Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
5
पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
6
'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!
7
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
8
पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
9
Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
10
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
11
मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
12
Vastu Shastra: 'या' सात वस्तू प्रत्येक श्रीमंत घरात हमखास सापडणारच; तुम्हीही घरी आणा!
13
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
14
महिलेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे हा विनयभंगाचा गुन्हा : उच्च न्यायालय
15
इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
16
इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
17
घर घेताना 'हा' खर्च कायम विसरून जातात लोक; नंतर होते मोठी डोकेदुखी, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
18
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
19
ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
20
मोदी अन् नितीश सरकारमधील मंत्री पगारासोबत पेन्शनही घेतात; RTI मधून खुलासा, ८ जणांची डबल कमाई
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांना; नागपूर जिल्ह्यात ६६६ योजना थांबल्य : १०० ठेकेदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:50 IST

जलजीवन मिशन : कंत्राट घेतले, पण कामाचा ठावठिकाणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण घराघरात दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी पुरविण्याच्या उद्देशाने २०२० पासून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३०४ योजनांपैकी मागील पाच वर्षात केवळ ६३८ कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी, अनेक गावांपर्यंत अद्यापही नळाने पाणी पोहोचलेले नाही.

याचा विचार करता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अॅक्शन मोडवर काम सुरू केले आहे. तब्बल १०० कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर दहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, असा दावा लोकप्रतिनिधी करीत असले तरी वास्तव वेगळे आहे. 'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांनाही बसला आहे. विभागाने कंत्राटदारांची जुनी देणी देण्यासाठी केंद्र सरकारकडे २० कोटी, राज्य सरकारकडे ५० कोटींचा निधी मागितला आहे, परंतु अद्याप तो निधी मिळालेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत आजपर्यंत विभागाने २८९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

निधी उपलब्ध असूनही तीन वर्षांत कामांना सुरुवात न झालेल्या आणि निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. तसेच १० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियादेखील सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. यापूर्वीही ३० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे; परंतु बिले थकीत असल्यामुळे कामांचा वेग वाढलेला नाही.

एकूण योजना - १३०४अंदाजे खर्च - ५५० कोटीपूर्ण झालेल्या योजना - ६३८अपूर्ण वा सुरुवात नसलेली कामे - ६६६आजपर्यंत झालेला खर्च - २८९ कोटी

बिल थकल्यामुळे योजना थंडावल्या

  • जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागात २०० कोटींची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.
  • शासनाकडून ३१ मार्चपर्यंत थकीत बिले अदा केली जातात, असा अनुभव आहे. मात्र, यंदा ६० कोटींची मागणी केली असता राज्य सरकारकडून फक्त १० कोटी मिळाले, ५० कोटी मिळालेले नाहीत.
  • यामुळे ठेकेदारांकडे उसनवारी ३ घेऊन देणी भरणं, कामगारांना मजुरी देणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
टॅग्स :nagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाई