शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांना; नागपूर जिल्ह्यात ६६६ योजना थांबल्य : १०० ठेकेदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:50 IST

जलजीवन मिशन : कंत्राट घेतले, पण कामाचा ठावठिकाणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण घराघरात दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी पुरविण्याच्या उद्देशाने २०२० पासून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३०४ योजनांपैकी मागील पाच वर्षात केवळ ६३८ कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी, अनेक गावांपर्यंत अद्यापही नळाने पाणी पोहोचलेले नाही.

याचा विचार करता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अॅक्शन मोडवर काम सुरू केले आहे. तब्बल १०० कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर दहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, असा दावा लोकप्रतिनिधी करीत असले तरी वास्तव वेगळे आहे. 'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांनाही बसला आहे. विभागाने कंत्राटदारांची जुनी देणी देण्यासाठी केंद्र सरकारकडे २० कोटी, राज्य सरकारकडे ५० कोटींचा निधी मागितला आहे, परंतु अद्याप तो निधी मिळालेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत आजपर्यंत विभागाने २८९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

निधी उपलब्ध असूनही तीन वर्षांत कामांना सुरुवात न झालेल्या आणि निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. तसेच १० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियादेखील सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. यापूर्वीही ३० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे; परंतु बिले थकीत असल्यामुळे कामांचा वेग वाढलेला नाही.

एकूण योजना - १३०४अंदाजे खर्च - ५५० कोटीपूर्ण झालेल्या योजना - ६३८अपूर्ण वा सुरुवात नसलेली कामे - ६६६आजपर्यंत झालेला खर्च - २८९ कोटी

बिल थकल्यामुळे योजना थंडावल्या

  • जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागात २०० कोटींची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.
  • शासनाकडून ३१ मार्चपर्यंत थकीत बिले अदा केली जातात, असा अनुभव आहे. मात्र, यंदा ६० कोटींची मागणी केली असता राज्य सरकारकडून फक्त १० कोटी मिळाले, ५० कोटी मिळालेले नाहीत.
  • यामुळे ठेकेदारांकडे उसनवारी ३ घेऊन देणी भरणं, कामगारांना मजुरी देणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
टॅग्स :nagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाई