शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

एक कोटीच्या खंडणीसाठी नागपुरात विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:10 AM

एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यावसायिकाचा मुलगा तीन दिवसानंतर खुलासा

जगदीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिकाचा अपहृत मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. २ आॅक्टोबरला तो घरी असताना रात्री ८.३० च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर काही फोन आले. त्यानंतर तो घरून बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे चिंतित झालेल्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे ३ आॅक्टोबरला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. अपहृत मुलगा बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या विद्यार्थी मित्रांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या लक्षात आले.त्यामुळे पोलिसांनी संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींकडे चौकशी केली. त्यांनी अपहृत मित्रासोबत संपर्क झाल्याचे मान्य केले. मात्र, तो कुठे गेला त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली.दरम्यान, चौकशी सुरू असताना गुरूवारी रात्री अपहृत मुलाच्या मोबाईलवरून वडिलांना फोन आला.‘भुरू बोल रहा है क्या, तेरा बेटा हमारे पास है यदि उसे सहीसलामत होना है तो एक करोड़ रुपए लगेंगे’ असे म्हणून फोन कापला. यामुळे हादरलेल्या वाहतूक व्यावसायिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.पोलिसांनी अपहृत मुलाशी जुळलेल्या दोन संशयास्पद युवकांवर नजर वळवली. ते दोघेही बेपत्ता असल्याचे कळाल्याने पोलिसांचा संशय वाढला. शुक्रवारी सकाळी या दोघांच्याही घरी पोलिसांनी धाव घेतली.एकाच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री तो दुसऱ्यासोबत कपडे घेऊन गेल्याचे म्हटले आहे. यामुळे या दोघांवर अपहरणाचा संशय अधिकच पक्का झाला आहे.

ठिकठिकाणी छापेमारीखंडणीसाठी यापूर्वी झालेले अपहरण आणि नंतरचा परिणाम लक्षात घेत पोलीस यंत्रणा कमालीची सक्रिय झाली आहे. त्यांनी या प्रकरणात अपहृत मुलाचा शोध घेऊन संशयितांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी चालवली आहे. शहराच्या बाजूला असलेल्या जंगलात आणि निर्जन ठिकाणीही पोलिसांची छापेमारी सुरू आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण