शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

केरळातील पुराचा फटका गरम मसाल्यांना बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 10:51 IST

केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.

ठळक मुद्देकेरळमध्ये गोदामातील माल पावसामुळे खराब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.काळीमिरे, सुंठ, जायपत्री, विलायची, जायफळ, तेजपान, दालचिनी, लवंग आणि सुक्यामेव्याच्या भावातही वाढ झाली आहे, शिवाय खोबरेल तेलाची आवकही कमी झाली आहे. सणासुदीचे दिवस आणि केरळची परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार असल्यामुळे ग्राहकांना मसाले जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोबरेल तेलाची आवक घटलीयंदा काही महिन्यांपूर्वी केरळ आणि कर्नाटक राज्यातील मसाल्यांच्या पदार्थांची आवक वाढल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. पण केरळातील पुराचा परिणाम पदार्थांच्या किमतीवर पडला. कोकण आणि केरळातून खोबरे व तेलाची आवक होते. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली असली तरीही राज्यात व्यापाऱ्यांकडे साठा आहे. अन्य राज्यातूनही तेल येत असल्यामुळे किमतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण केरळातील स्थिती सुधारली नाही तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.मसाल्यात तेजीची शक्यतासंतोष सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक जगदीश बत्रानी यांनी सांगितले की, केरळ येथील गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून, हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने पुढील काही महिने केरळमधून येणाऱ्या मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात श्रावण महिन्यासोबत सणवार सुरू होतात. त्यामुळे मसाला पदार्थांची मागणीदेखील वाढते. मात्र पुरवठा कमी असल्यामुळे मसाल्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीसोबतच विलायची ६०० ते ६५० रुपये किलो, लवंग ५७० रु., जायफळ १७० रु., तेजपान ५० ते १०० रुपये भाव आहेत. याशिवाय सुक्यामेव्याचे भावही वाढले आहेत. काजू ८०० ते ८५० रुपये किलो, बदाम ७०० ते ७५० रुपये आणि आक्रोड-बी ९०० रुपये किलो विकल्या जात आहे.मसाल्यांचे उत्पादन तामिळनाडू, कनार्टक, मध्य प्रदेशात घेतले जाते. पण केरळच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे, यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फेरले आहे.

 

 

टॅग्स :foodअन्न