शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

केरळातील पुराचा फटका गरम मसाल्यांना बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 10:51 IST

केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.

ठळक मुद्देकेरळमध्ये गोदामातील माल पावसामुळे खराब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.काळीमिरे, सुंठ, जायपत्री, विलायची, जायफळ, तेजपान, दालचिनी, लवंग आणि सुक्यामेव्याच्या भावातही वाढ झाली आहे, शिवाय खोबरेल तेलाची आवकही कमी झाली आहे. सणासुदीचे दिवस आणि केरळची परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार असल्यामुळे ग्राहकांना मसाले जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोबरेल तेलाची आवक घटलीयंदा काही महिन्यांपूर्वी केरळ आणि कर्नाटक राज्यातील मसाल्यांच्या पदार्थांची आवक वाढल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. पण केरळातील पुराचा परिणाम पदार्थांच्या किमतीवर पडला. कोकण आणि केरळातून खोबरे व तेलाची आवक होते. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली असली तरीही राज्यात व्यापाऱ्यांकडे साठा आहे. अन्य राज्यातूनही तेल येत असल्यामुळे किमतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण केरळातील स्थिती सुधारली नाही तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.मसाल्यात तेजीची शक्यतासंतोष सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक जगदीश बत्रानी यांनी सांगितले की, केरळ येथील गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून, हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने पुढील काही महिने केरळमधून येणाऱ्या मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात श्रावण महिन्यासोबत सणवार सुरू होतात. त्यामुळे मसाला पदार्थांची मागणीदेखील वाढते. मात्र पुरवठा कमी असल्यामुळे मसाल्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीसोबतच विलायची ६०० ते ६५० रुपये किलो, लवंग ५७० रु., जायफळ १७० रु., तेजपान ५० ते १०० रुपये भाव आहेत. याशिवाय सुक्यामेव्याचे भावही वाढले आहेत. काजू ८०० ते ८५० रुपये किलो, बदाम ७०० ते ७५० रुपये आणि आक्रोड-बी ९०० रुपये किलो विकल्या जात आहे.मसाल्यांचे उत्पादन तामिळनाडू, कनार्टक, मध्य प्रदेशात घेतले जाते. पण केरळच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे, यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फेरले आहे.

 

 

टॅग्स :foodअन्न