शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 21:49 IST

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देकर्नल पुरोहितने रचला सरसंघचालकांच्या हत्येचा कट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवे वादंग निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.नागपुरातील जाफरनगर भागात रविवारी रात्री ‘अलायन्स अगेन्स्ट सीएए-एनआरसी-एनपीआर’च्या वतीने संविधान जनजागरण सभा आयोजित करण्यात आली होती. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या विरोधात बोलत असताना बी.जी.कोळसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इतर कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाला नाही. तर करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ‘पॉईंट नाईन’ या पिस्तुलाने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे कृत्य मुंबई पोलीस दलातील कुणी हिंदुत्ववाद्याने केले असावे, असा दावा कोळसे पाटील यांनी केला.मालेगाव बॉम्बहल्ला प्रकरणात अनेक वर्षे अटकेत असलेल्या कर्नल पुरोहितने सुरुवातीला विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले होते. परंतु त्यानंतर त्याच कर्नल पुरोहितने त्यांच्या हत्येचा कट रचला होता व तशी सुपारीदेखील काही ‘शार्पशूटर्स’ला दिली होती, असा आरोपदेखील बी.जी.कोळसे पाटील यांनी केला.अटलबिहारी वाजपेयींविरोधात वादग्रस्त विधानया कार्यक्रमादरम्यान बी.जी.कोळसे पाटील यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भातदेखील वादग्रस्त विधान केले. अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्येक विदेशी दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे. हे त्यांचे हिंदुत्व होते. ५ डिसेंबर १९९० रोजी दिलेल्या भाषणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला होता, असेदेखील बी.जी.कोळसे पाटील म्हणाले.भाजपची आक्रमक भूमिका, पोलिसांत तक्रारबी.जी.कोळसे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात भाजयुमोच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली आहे. कोळसे पाटील यांनी जाणूनबुजून समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अवमानजनक व आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या भाषणाची चौकशी व्हावी व त्यांच्याविरोधात तसेच आयोजनकर्त्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजयुमोतर्फे शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, जितेंद्र ठाकूर, राहुल खंगार, बाल्या रारोकर यांनी तक्रार दाखल केली. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनीदेखील बी.जी.कोळसे पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाMumbaiमुंबई