शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘कही खुशी, कही गम’, तरी दाखविणार ‘तीन’मध्ये ‘दम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 7:00 AM

Nagpur News तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमोठ्या पक्षांचा दावा, मनपा आमचीच नवी प्रभागरचना कुणाच्या फायद्याची ?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका निवडणुकांसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व सर्वच राजकीय पक्षांकडून नियोजनाचे नवीन गणित आखणे सुरू झाले. काही पक्षांचे निवडणूक सूत्रच बिघडले असले तरी या तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आपल्यालाच फायदा होईल, असा दावा मोठ्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने ही प्रभागरचना आपल्याच फायद्याची असल्याची भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने मात्र नवीन प्रभाग रचनेमुळे काहीच फरक पडत नसल्याचे म्हणत चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागामुळे परत सत्तेवर येऊ असाच दावा केला आहे. शहरात अस्तित्वासाठी अद्यापही संघर्ष करणाऱ्या मनसेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्रिसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवकांच्या दारात पायपीट करावी लागणार असल्याने जनतेचे नुकसान होणार असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे.

 

तीन सदस्यीय रचनेचा काँग्रेसला फायदाच

२००२ साली मी महापौर झालो असताना शहरात तीन सदस्यीय प्रभाग रचनाच होती. काँग्रेसला सत्तेवर येऊ द्यायचे नाही यासाठी भाजपने प्रभागाचे तुकडे करत चार सदस्यीय रचना आणली होती. नवीन प्रभाग रचनेचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. १५ वर्षांतील धूळफेक जनतेच्या लक्षात आली असून मतदार जागरुक झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत काँग्रेसचेच पारडे जड असेल.

- आ.विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस

 

वॉर्डाच्या संख्येने फरक नाही

ज्यांना निवडणुकीत पडण्याची भीती वाटते त्यांनी १, २, ३ किंवा ४ प्रभाग तयार करावेत. भाजपला कशाचाही फरक पडत नाही. आमच्याकडे व्हिजनरी नेत्यांसोबतच लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज आहे. महाविकास आघाडीतील पक्ष संकुचित मानसिकतेचे असून लोकांना संभ्रमित करण्यासाठी प्रभाग रचना बदलण्याची चाल खेळली जात आहे.

- आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

 

राष्ट्रवादीला फायदा मिळणार

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक करण्याचा निर्णय जनहित लक्षात ठेवून घेतला आहे. राष्ट्रवादीने मनपा निवडणुकीसाठी नियोजन केले आहे. या निर्णयामुळे पक्षाला फायदाच होणार आहे. आम्ही काँग्रेस व सेनेसह मिळून निवडणूक लढू इच्छितो. जर नागपुरात महाविकास आघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर निवडणुकीसाठी देखील पक्ष तयार आहे.

- दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

 

शिवसेनेसाठी चांगली संधी

मनपा निवडणुकीसाठी शिवसेना यंदा नव्या उर्जेने उतरणार आहे. शहरात तीन सदस्यीय प्रभागरचना असल्याने शिवसेनेसाठी चांगली संधी राहणार आहे. बहुतांश ठिकाणी भाजप नगरसेवकांनी कामच केलेले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता खूष आहे. शिवाय शहरात संघटन बळकटीवर आम्ही भर दिला आहे. त्यामुळे यावेळी चित्र बदललेले दिसेल.

- नितीन तिवारी, शहरप्रमुख, शिवसेना

 

निर्णय चुकीचा, आमच्या नियोजनाला धक्का नाही

मुळात राज्य शासनाने परत बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा निर्णय घेऊन घोडचूक केली आहे. यामुळे प्रभागांमध्ये समस्या वाढतात व जबाबदारी कुणा एका नगरसेवकावर निश्चित करता येत नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम करण्यात येते. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरू. या रचनेमुळे आमचे नुकसान होणार नाही हे निश्चित.

- हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस, मनसे

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका