शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 11:43 IST

अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समारंभात आवाहन

नागपूर : आज माध्यमांमधून प्रश्न विचारण्याची ताकद हरवत चालली आहे. प्रश्न उपस्थित करणे हा पत्रकारितेचा खरा धर्म आहे. तो विसरला जाऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. स्व. अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा पत्रकारिता पुरस्कार-२०२० वनामती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते. सत्कारमूर्ती ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह पुरस्कारप्राप्त पत्रकार तथा ज्यूरी मेंबर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, शैलेश पांडे, अरुण नाईक आणि प्रमोद माने व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामीणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये नगण्य वाव मिळत असल्याची खंत व्यक्त करून पी. साईनाथ म्हणाले, “देशातील ६९ टक्के जनता खेड्यात राहते. देशात ७८० भाषा रोजच्या व्यवहारात बोलल्या जातात. आदिवासींच्या भाषा कमी लोकांमध्ये बोलली जात असली, तरी त्यांची संस्कृती त्यातूनच टिकून आहे. राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ग्रामीणांना त्यांच्या प्रथम पानावर फक्त ०.६७ टक्का जागा मिळते, असे सेंटर फॉर इंडिया स्टडीजच्या अध्ययनातून पुढे आले. बॉलिवूड कलाकारांना टिपण्यासाठी माध्यमांचे २०० कॅमेरे असतात; मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.” माध्यमांच्या मुस्कटदाबीवरही त्यांनी भाष्य केले.

यावेळी डॉ. खुणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ज्यूरी मेंबरर्सच्या वतीने अभय देशपांडे, सत्कारमूर्तींच्या वतीने संजय आवटे आणि देवेंद्र गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. तर आभार मनोज जवंजाळ यांनी मानले.

यांचा झाला सन्मान

- २०२०-२१ साठीचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई लोकमतचे तत्कालीन सल्लागार संपादक दिनकर रायकर यांच्या निधनामुळे कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी स्वीकारला. १ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

- ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- मुद्रित माध्यमातील कामगिरीसाठी संजय आवटे (संपादक, लोकमत, पुणे), इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामगिरी नीलेश खरे (साम टीव्ही, मुंबई), शोधपत्रकारिता विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), कृषी पत्रकारिता डॉ. राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाइन, पुणे), ई-मीडिया तुषार खरात (लय भारी, मुंबई), सामाजिक पत्रकारिता देवेंद्र गावंडे (लोकसत्ता, नागपूर), महिला पत्रकार म्हणून मेघना ढोके (लोकमत, नाशिक) आणि कोरोना आरोग्यविषयक वृत्तांकनासाठी महेंद्रकुमार महाजन (सकाळ, नाशिक) या सर्वांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर