शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रश्न विचारण्याचा धर्म पत्रकारांनी विसरू नये - पी साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 11:43 IST

अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समारंभात आवाहन

नागपूर : आज माध्यमांमधून प्रश्न विचारण्याची ताकद हरवत चालली आहे. प्रश्न उपस्थित करणे हा पत्रकारितेचा खरा धर्म आहे. तो विसरला जाऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. स्व. अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा पत्रकारिता पुरस्कार-२०२० वनामती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते. सत्कारमूर्ती ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह पुरस्कारप्राप्त पत्रकार तथा ज्यूरी मेंबर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, शैलेश पांडे, अरुण नाईक आणि प्रमोद माने व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामीणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये नगण्य वाव मिळत असल्याची खंत व्यक्त करून पी. साईनाथ म्हणाले, “देशातील ६९ टक्के जनता खेड्यात राहते. देशात ७८० भाषा रोजच्या व्यवहारात बोलल्या जातात. आदिवासींच्या भाषा कमी लोकांमध्ये बोलली जात असली, तरी त्यांची संस्कृती त्यातूनच टिकून आहे. राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ग्रामीणांना त्यांच्या प्रथम पानावर फक्त ०.६७ टक्का जागा मिळते, असे सेंटर फॉर इंडिया स्टडीजच्या अध्ययनातून पुढे आले. बॉलिवूड कलाकारांना टिपण्यासाठी माध्यमांचे २०० कॅमेरे असतात; मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.” माध्यमांच्या मुस्कटदाबीवरही त्यांनी भाष्य केले.

यावेळी डॉ. खुणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ज्यूरी मेंबरर्सच्या वतीने अभय देशपांडे, सत्कारमूर्तींच्या वतीने संजय आवटे आणि देवेंद्र गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. तर आभार मनोज जवंजाळ यांनी मानले.

यांचा झाला सन्मान

- २०२०-२१ साठीचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई लोकमतचे तत्कालीन सल्लागार संपादक दिनकर रायकर यांच्या निधनामुळे कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी स्वीकारला. १ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

- ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- मुद्रित माध्यमातील कामगिरीसाठी संजय आवटे (संपादक, लोकमत, पुणे), इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामगिरी नीलेश खरे (साम टीव्ही, मुंबई), शोधपत्रकारिता विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), कृषी पत्रकारिता डॉ. राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाइन, पुणे), ई-मीडिया तुषार खरात (लय भारी, मुंबई), सामाजिक पत्रकारिता देवेंद्र गावंडे (लोकसत्ता, नागपूर), महिला पत्रकार म्हणून मेघना ढोके (लोकमत, नाशिक) आणि कोरोना आरोग्यविषयक वृत्तांकनासाठी महेंद्रकुमार महाजन (सकाळ, नाशिक) या सर्वांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर