शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगडची निर्मिती राजद्रोह होता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:29 IST

राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांचा प्रकाश जाधवांना सवाल : आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळात बिहारमधील झारखंड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील छत्तीसगड या तीन लहान राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा केंद्र सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे या राज्य निर्मितीत त्यांचाही तितकाच वाटा होता. तेव्हा तो राजद्रोह होता का, असा सवाल विदर्भवाद्यांनी प्रकाश जाधव यांना विचारला असून स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी असून ते मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त केला.मूर्खपणा व हास्यास्पद वक्तव्यशिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी विदर्भवाद्यांबाबत केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे व हास्यास्पद आहे. वाजपेयी यांच्या काळात उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा शिवसेनाही त्यांच्यासोबतच सत्तेत होते. त्यामुळे त्या राज्य निर्मितीत त्यांचाही वाटा होता. तेव्हा त्याला राजद्रोह म्हणायचे का? त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आहे. आम्ही वकील मंडळी राज्यातील व्यवस्थेविरुद्ध बोलतो. वकिली हे आमचे प्रोफेशन आहे. आम्ही सरकारच्या बाजूनेही लढू शकतो किंवा सरकारच्या विरुद्धही लढू शकतो. त्यामुळे आम्ही काही चुकीचे करतो असे होत नाही.अ‍ॅड. मुकेश समर्थअध्यक्ष, व्ही-कॅन...तो ही राजद्रोह म्हणाल का?अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांनी तीन नवीन राज्याची निर्मिती केली. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनाही सत्तेत होते. तेव्हा तीन नवीन राज्याची निर्मिती करण्याचा तेव्हाचा वाजपेयी यांच्या निर्णयाला सुद्धा राजद्रोह म्हणायचे आहे का? त्यांच्याविरुद्धही प्रकाश जाधव राजद्रोहाच्या कारवाईची मागणी मागणी करणार का? वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी आहे. वेगळा विदर्भ झाला तर तो काही देशाबाहेर राहणार नाही. एका घरात दोन भावांचे दोन पक्ष चालू शकतात. तर मग दोन राज्य का नाही? स्वतंत्र विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी असून तो मिळेपर्यंत आम्ही लढत राहू.राम नेवलेमुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती... त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावेमहाराष्ट्र राज्यात राहून विदर्भ कसा मागास राहिला, हे अनेकदा प्रमाणासह सिद्ध झालेले आहे. त्यावर बरेच काही बोललेही जाते. आकडेवारीवरून ते अनेकदा सिद्धही करण्यात आलेले आहे. परंतु विदर्भात राहूनही विदर्भातील व्यथा ज्यांना दिसून येत नाही. त्यांना काय म्हणावे. ज्यांना महाराष्ट्राचा पुळका असेल त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावे. स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी आहे, आणि ती पूर्ण करेपर्यंत आम्ही लढत राहू.अ‍ॅड. नंदा परातेआदिम संविधान संरक्षण समितीविदर्भाचा नागरिकच योग्य वेळी उत्तर देईलविदर्भवाद्यांबाबत करण्यात आलेले वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असे आहे. याचे उत्तर विदर्भातील नागरिकच येणाऱ्या निवडणुकीत मतदानपेटीतून योग्य पद्धतीने देईलच.राजकुमार तिरपुडेसंस्थापक, विदर्भ माझा

 

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन