शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगडची निर्मिती राजद्रोह होता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:29 IST

राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांचा प्रकाश जाधवांना सवाल : आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी करीत विदर्भवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याचा विदर्भवाद्यांनी चांगलाच समाचार घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळात बिहारमधील झारखंड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील छत्तीसगड या तीन लहान राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा केंद्र सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. त्यामुळे या राज्य निर्मितीत त्यांचाही तितकाच वाटा होता. तेव्हा तो राजद्रोह होता का, असा सवाल विदर्भवाद्यांनी प्रकाश जाधव यांना विचारला असून स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी असून ते मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त केला.मूर्खपणा व हास्यास्पद वक्तव्यशिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी विदर्भवाद्यांबाबत केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे व हास्यास्पद आहे. वाजपेयी यांच्या काळात उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हा शिवसेनाही त्यांच्यासोबतच सत्तेत होते. त्यामुळे त्या राज्य निर्मितीत त्यांचाही वाटा होता. तेव्हा त्याला राजद्रोह म्हणायचे का? त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आहे. आम्ही वकील मंडळी राज्यातील व्यवस्थेविरुद्ध बोलतो. वकिली हे आमचे प्रोफेशन आहे. आम्ही सरकारच्या बाजूनेही लढू शकतो किंवा सरकारच्या विरुद्धही लढू शकतो. त्यामुळे आम्ही काही चुकीचे करतो असे होत नाही.अ‍ॅड. मुकेश समर्थअध्यक्ष, व्ही-कॅन...तो ही राजद्रोह म्हणाल का?अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांनी तीन नवीन राज्याची निर्मिती केली. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनाही सत्तेत होते. तेव्हा तीन नवीन राज्याची निर्मिती करण्याचा तेव्हाचा वाजपेयी यांच्या निर्णयाला सुद्धा राजद्रोह म्हणायचे आहे का? त्यांच्याविरुद्धही प्रकाश जाधव राजद्रोहाच्या कारवाईची मागणी मागणी करणार का? वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी आहे. वेगळा विदर्भ झाला तर तो काही देशाबाहेर राहणार नाही. एका घरात दोन भावांचे दोन पक्ष चालू शकतात. तर मग दोन राज्य का नाही? स्वतंत्र विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी असून तो मिळेपर्यंत आम्ही लढत राहू.राम नेवलेमुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती... त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावेमहाराष्ट्र राज्यात राहून विदर्भ कसा मागास राहिला, हे अनेकदा प्रमाणासह सिद्ध झालेले आहे. त्यावर बरेच काही बोललेही जाते. आकडेवारीवरून ते अनेकदा सिद्धही करण्यात आलेले आहे. परंतु विदर्भात राहूनही विदर्भातील व्यथा ज्यांना दिसून येत नाही. त्यांना काय म्हणावे. ज्यांना महाराष्ट्राचा पुळका असेल त्यांनी महाराष्ट्रात खुशाल राहावे. स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची मागणी आहे, आणि ती पूर्ण करेपर्यंत आम्ही लढत राहू.अ‍ॅड. नंदा परातेआदिम संविधान संरक्षण समितीविदर्भाचा नागरिकच योग्य वेळी उत्तर देईलविदर्भवाद्यांबाबत करण्यात आलेले वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी असे आहे. याचे उत्तर विदर्भातील नागरिकच येणाऱ्या निवडणुकीत मतदानपेटीतून योग्य पद्धतीने देईलच.राजकुमार तिरपुडेसंस्थापक, विदर्भ माझा

 

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन