शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:02 AM

आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.

ठळक मुद्देपांडुरंग भक्तीच्या स्वरधारांनी हरपले देहभान : सप्तकचे भक्तिमय आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.‘सावळा घन’च्या रूपाने कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा वैशंपायन, समीहन कशाळकर व सौरभ काडगावकर या तरुण गायकांनी त्यांच्या स्वरांमधून भक्तीच्या अमृतधारा बरसवल्या की, सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता पांडुरंगाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाला. मुग्धा यांनी ‘जनविजन झाले आम्हा...’ने या कार्यक्रमाला सुरुवात केली. टिळा लावणे, अंगाला राख फासणे म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य, संन्यास हे बाह्यवेश नसून मनाची घडणे होय. संसाराबद्दल विराग आणि भगवंताबद्दल अनुराग हे वैराग्य. कुणी संसारात राहूनही भक्तिमार्गाने वैराग्य ध्यान मिळवू शकतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. देव कळतो तो नामस्मरणातून, त्यासाठी वेदांचे ज्ञान कळणे गौण ठरते. संतांच्या अभिवचनातील हा सार उलगडणारा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण...’ हा अभंग सौरभ यांनी सादर करून श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. समीहन यांनी पुढे शास्त्रीय अनुरागातील ‘पुंडलिका भेटी...’मधून पांडुरंगभेटीचे मोल उजागर केले. मुग्धा यांनी ‘श्रीरंगा कमलाकांता...’ हे गोपिकांचा भक्तिनाद उलडणारे नाट्यपद तेवढ्याच तल्लीनतेने सादर केले. पुढे या भक्तिमय स्वरधारा अशाच बरसत राहिल्या आणि श्रोत्यांना चिंब करून गेल्या. ‘तल्लीन होऊन नाचू दे..., कान्होबा, तुझी घोंगडी..., काय शोधिसी तू..., कानडा राजा पंढरीचा..., सगुण सुंदर..., सरीवर सरी..., माझे माहेर पंढरी..., कोण पुण्य गाठी..., मन आनंद आनंद..., अगा वैकुंठीच्या राया...’ असा सुरेल स्वरांचा भक्तिनाद रसिकांच्या कानामनात भिनला.कार्यक्रमात श्रीकांत सूर्यवंशी, राजन भावे, आशिष मुजुमदार, उज्ज्वला गोकर्ण, निनाद सोलापूरकर, नितीन वानखेडे यावाद्यकलावंतांनी भक्तिसंगीताचा गजर केला. कार्यक्रमाचे सुरेख निरुपण रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमात समीर बेंद्रे, मिलिंद कुकडे, भारतभूषण जोशी, अमित दिवाडकर, डॉ. उदय गुप्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर