शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST

Nagpur : ४० टक्के काम रखडलेले, शासनाच्या पाहणीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : मौदा तालुक्यातील १२४ गावे आणि शेकडो वाड्यांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत नळ योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी दोन उन्हाळे उलटूनही अजूनही पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. कामांची गती संथ असून अनेक ठिकाणी कामे मनमानी पद्धतीने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जात पूर्ण करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून अनेक गावांतील कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत.

काही गावांमध्ये कामे सुरू झाली असली, तरी ४० टक्के कामे सायगाणी अजूनही अपूर्ण आहेत. या स्थितीत उन्हाळ्यात गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही तालुका पाणीपुरवठा विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

अनेक भागांत पाइपलाइन आणि पाण्याच्या टाक्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे गावकऱ्यांनी मोबाइलमधील छायाचित्रे दाखवून अधिकाऱ्यांसमोर पंचनामा केला. या निकृष्ट कामामुळे जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये विभागलेल्या बहुतेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या निधीतून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी कामे बंद पडली आहेत. सध्या ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित ४० टक्के रखडलेली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून शासनाला मागणी करण्यात येत आहे की, आधी पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच कामांकडे लक्ष न देणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला की नाही, कामांची गुणवत्ता कितपत चांगली आहे, याची खरी पाहणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, अनेक ठिकाणी पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या, विहिरींचे खोलीकरण आणि टंचाईग्रस्त गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना दोन वर्षांतही पूर्ण झालेली नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूर