शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST

Nagpur : ४० टक्के काम रखडलेले, शासनाच्या पाहणीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : मौदा तालुक्यातील १२४ गावे आणि शेकडो वाड्यांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत नळ योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी दोन उन्हाळे उलटूनही अजूनही पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. कामांची गती संथ असून अनेक ठिकाणी कामे मनमानी पद्धतीने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जात पूर्ण करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून अनेक गावांतील कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत.

काही गावांमध्ये कामे सुरू झाली असली, तरी ४० टक्के कामे सायगाणी अजूनही अपूर्ण आहेत. या स्थितीत उन्हाळ्यात गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही तालुका पाणीपुरवठा विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

अनेक भागांत पाइपलाइन आणि पाण्याच्या टाक्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे गावकऱ्यांनी मोबाइलमधील छायाचित्रे दाखवून अधिकाऱ्यांसमोर पंचनामा केला. या निकृष्ट कामामुळे जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये विभागलेल्या बहुतेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या निधीतून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी कामे बंद पडली आहेत. सध्या ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित ४० टक्के रखडलेली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून शासनाला मागणी करण्यात येत आहे की, आधी पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच कामांकडे लक्ष न देणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला की नाही, कामांची गुणवत्ता कितपत चांगली आहे, याची खरी पाहणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, अनेक ठिकाणी पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या, विहिरींचे खोलीकरण आणि टंचाईग्रस्त गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना दोन वर्षांतही पूर्ण झालेली नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूर