शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मौद्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ : दोन वर्षांनंतरही १२४ गावात नळयोजना पोहोचलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST

Nagpur : ४० टक्के काम रखडलेले, शासनाच्या पाहणीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : मौदा तालुक्यातील १२४ गावे आणि शेकडो वाड्यांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत नळ योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी दोन उन्हाळे उलटूनही अजूनही पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. कामांची गती संथ असून अनेक ठिकाणी कामे मनमानी पद्धतीने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जात पूर्ण करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून अनेक गावांतील कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत.

काही गावांमध्ये कामे सुरू झाली असली, तरी ४० टक्के कामे सायगाणी अजूनही अपूर्ण आहेत. या स्थितीत उन्हाळ्यात गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही तालुका पाणीपुरवठा विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

अनेक भागांत पाइपलाइन आणि पाण्याच्या टाक्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे गावकऱ्यांनी मोबाइलमधील छायाचित्रे दाखवून अधिकाऱ्यांसमोर पंचनामा केला. या निकृष्ट कामामुळे जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमध्ये विभागलेल्या बहुतेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या निधीतून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी कामे बंद पडली आहेत. सध्या ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित ४० टक्के रखडलेली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून शासनाला मागणी करण्यात येत आहे की, आधी पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच कामांकडे लक्ष न देणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला की नाही, कामांची गुणवत्ता कितपत चांगली आहे, याची खरी पाहणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, अनेक ठिकाणी पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या, विहिरींचे खोलीकरण आणि टंचाईग्रस्त गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना दोन वर्षांतही पूर्ण झालेली नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूर