शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

कॉंग्रेसनेच केला बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 18:06 IST

किरण रिजिजू : कॉंग्रेस पक्षच संविधानाचा मारेकरी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत कॉंग्रेसने भाजप संविधानविरोधी असल्याचा खोटा अपप्रचार केला. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसनेच वारंवार संविधानाची हत्या केली. इतकेच नव्हे तर देशाला संविधान देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसलाच कंटाळून मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. कॉंग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला होता, असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लावला. नागपुरात शुक्रवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने अपप्रचाराचे जाळे विणले व त्यात अनुसूचित जाती तसेच जमातीचे नागरिक अडकले. प्रत्यक्षात भाजपनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जपण्याचे मौलिक कार्य केले. कॉंग्रेसने त्यांना भारतरत्नदेखील मिळू दिले नव्हते. कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच त्यांना हा सन्मान मिळाला होता. ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला कधी मानले नाही तेच लोक आता संविधान हाती घेऊन राजकारण करीत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली..

अपप्रचार सुरू राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन

काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी आहे. त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही. कॉंग्रेसकडून संविधानाचे नाव घेऊन अपप्रचार सुरूच राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा रिजिजू यांनी दिला.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले हा शापचयावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने कधीच संविधानाचा आदर केला नाही. त्यांना संविधानाची तत्वेदेखील समजत नाहीत. ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले हा शापच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन रिजिजू यांनी केले.

प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन

केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे भवन सर्व जातीधर्मांसाठी खुले असेल. यात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, वाचनालय, क्रीडा सुविधा उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, अशी माहिती रिजिजू यांनी दिली.

दीक्षाभूमीला दिली भेटदरम्यान, रिजिजू यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलींद माने, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, सुभाष पारधी, संदीप गवई प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर