शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसनेच केला बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 18:06 IST

किरण रिजिजू : कॉंग्रेस पक्षच संविधानाचा मारेकरी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत कॉंग्रेसने भाजप संविधानविरोधी असल्याचा खोटा अपप्रचार केला. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसनेच वारंवार संविधानाची हत्या केली. इतकेच नव्हे तर देशाला संविधान देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसलाच कंटाळून मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. कॉंग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला होता, असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लावला. नागपुरात शुक्रवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने अपप्रचाराचे जाळे विणले व त्यात अनुसूचित जाती तसेच जमातीचे नागरिक अडकले. प्रत्यक्षात भाजपनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जपण्याचे मौलिक कार्य केले. कॉंग्रेसने त्यांना भारतरत्नदेखील मिळू दिले नव्हते. कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच त्यांना हा सन्मान मिळाला होता. ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला कधी मानले नाही तेच लोक आता संविधान हाती घेऊन राजकारण करीत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली..

अपप्रचार सुरू राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन

काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी आहे. त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही. कॉंग्रेसकडून संविधानाचे नाव घेऊन अपप्रचार सुरूच राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा रिजिजू यांनी दिला.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले हा शापचयावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने कधीच संविधानाचा आदर केला नाही. त्यांना संविधानाची तत्वेदेखील समजत नाहीत. ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले हा शापच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन रिजिजू यांनी केले.

प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन

केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे भवन सर्व जातीधर्मांसाठी खुले असेल. यात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, वाचनालय, क्रीडा सुविधा उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, अशी माहिती रिजिजू यांनी दिली.

दीक्षाभूमीला दिली भेटदरम्यान, रिजिजू यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलींद माने, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, सुभाष पारधी, संदीप गवई प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर