शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मनीषनगर अंडरपास'नेच पाडले महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 14:38 IST

सिमेंट राेडची डाेकेदुखी, ड्रेनेज सिस्टीमचा अभाव, दर पावसात भरते पाणी

आशिष रॉय

नागपूर : मनीषनगर अंडरब्रिजमध्ये नरेंद्रनगर पुलाप्रमाणे पाणी साचणार नाही, असा दावा महामेट्राेने बांधकामादरम्यान केला हाेता. मात्र दाेनच वर्षात महामेट्राेच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. अत्याधुनिक तंत्राने आरयूबीचे बांधकाम करण्याचा दावा केला असताना पाऊस हाेताच पुलाखाली तलाव साचत असल्याचे दिसते. अनेकदा या पुलाखालून जाणेही अशक्य हाेते.

येथील स्थिती पाहता महामेट्राेने आरयूबीवर बनविला; पण पाणी निकासीसाठी आवश्यक ड्रेनेज सिस्टीम तयार केली नाही. याच कारणाने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण हाेते. नागपूर महापालिकेने एप्रिलपासून या पुलाच्या देखभाली दुरुस्तीची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र परिस्थिती सुधारण्याचे चित्र नाही. या पावसाळ्यातही अनेक दिवस या पुलाखाली माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते.

ड्रेनेज सिस्टीम ठीक नाही

मनीषनगर निवासी सुहास नायसे यांनी राेजची समस्या मांडली. आरयूबीचे ड्रेनेज सिस्टीम याेग्य नसल्याने अनेकदा पाणी साचले असते व वाहन काढणे कठीण जाते. सरकारने ही समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली.

राेजचा मनस्ताप

स्थानिक निवासी मुकेश देवरे यांनी खाेटे दावे करण्यासाठी मेट्राे प्रबंधनावर टीका केली. पावसाळ्यात मनीषनगरच्या नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागताे. ड्रेनेज सिस्टीम नसल्याने आरयूबीखाली पाणी साचले असते. नरेंद्रनगर पुलाखालीही गुडघाभर पाणी साचलेले राहते. त्यामुळे लांब चक्कर मारून मनीषनगर ओव्हरब्रिजचा वापर करावा लागताे. यामुळे वेळेसह पेट्राेलचा खर्च वाढताे.

अधिकाऱ्यांची जबाबदारी : येरावार

माजी नगरसेवक मदन येरावार म्हणाले, ४ मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. यामुळे आरयूबीची समस्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. अधिकारी माजी नगरसेवकांचा फाेन उचलत नाही किंवा अरेरावीने बाेलतात. प्रशासनाने शहरात मान्सूनपूर्व तयारी केली नाही.

अतिपावसामुळे समस्या : मेट्रो

मेट्राेच्या अधिकाऱ्यांच्या मते रस्ता उंच झाल्याने आरयूबीखाली पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे यावर्षी पावसाचा जाेर अधिक असल्यानेही समस्या वाढली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर