शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

पर्यावरण व आर्थिक धोरण सोबत चालविणे अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:12 IST

ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल या समस्या येत्या ३० वर्षात गंभीर रूप धारण करणार आहेत. मात्र अजून ३० वर्षे वेळ आहे असा विचार करून दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील.

ठळक मुद्देईश्रेईच्या ‘ऊर्जावरण’ परिषदेत व‘तावरण बदलावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल या समस्या येत्या ३० वर्षात गंभीर रूप धारण करणार आहेत. मात्र अजून ३० वर्षे वेळ आहे असा विचार करून दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे या अल्प काळात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पावले उचलावी लागतील. तंत्रज्ञानाने भरीव प्रगती केली आहे आणि त्याचा उपयोग करावा लागेल. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात अधिक परिश्रम घ्यावे लागेल. हा विचार करून उद्योजकांसाठी वेगळा व सामान्य जनतेसाठी वेगळा दृष्टिकोन ठेवून योजना आखणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि आर्थिक धोरण सोबत चालविणे अत्यावश्यक झाल्याचे विचार इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. अशोक मोखा यांनी व्यक्त केले.इंडियन सोसायटी आॅफ रेफ्रिजरेटर, हिटिंग अ‍ॅन्ड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (ईश्रेई) संस्थेच्यावतीने वातावरण बदलामुळे उद््भवणारे धोके आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी उपायांवर संखोल मंथन करण्यासाठी ‘ऊर्जावरण’ परिषदेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी डॉ. मोखा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ईश्रेईचे क्षेत्रीय संचालक शंकर सपालिका, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष दिलीप मिर्झापुरे व सचिव नरेंद्र पाम्पट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. परिषदेत प्रामुख्याने हिटिंग, कूलिंग व रेफ्रिजरेशन आदींशी संबंधित उद्योग आणि पर्यावरण यावर विशेषत्वाने भर होता. डॉ. मोखा यांनी मानवीय भावनेतून पर्यावरणाचा विषय हाताळणे गरजेचे असल्याचे सांगितले. ऊर्जा बचत हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या पूर्वजांनी एका वस्तूच्या वारंवार उपयोगावर भर दिला होता. ही बाब शिकण्यासारखी आहे. कूलिंग उद्योगात वापरणाऱ्या रेफ्रिजरेशनचा वारंवार उपयोग कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला ग्लेशियामधून मिळणाºया पाण्याचे प्रमाण केवळ ४ टक्के आहे व बाकी ९६ टक्के पाणी वनसंपदेमुळे मिळते. त्यामुळे वनसंवर्धन केले तरच पाण्याचे संवर्धन होईल. आपण आंतरिक आवाज ऐकण्यासाठी, आत्म्याशी जुळण्यासाठी मंदिरात जातो. याचप्रमाणे पर्यावरणाचा विषय गंभीरपणे समजण्यासाठी पर्यावरणाशी आत्मीयतेने जुळावे लागेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना शंकर सपालिका यांनी प्रदूषण हे मनुष्यनिर्मित असून इतरांवर दोषारोप करीत बसण्यापेक्षा प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

अंतर्गत शुद्ध हवा प्रत्येकाला आवश्यक : पत्कीपरिषदेच्या दुसºया सत्रात एअरोप्युअर युव्ही सिस्टीमचे उपाध्यक्ष केदार पत्की यांनी ‘इनडोअर एअर क्वॉलिटी’ या विषयावर मार्गदर्शन केले. अनेकदा रुग्णालयात आॅपरेशननंतर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. याचे कारण रुग्णालयात पसरलेल्या अशुद्ध हवेमुळे इन्फेक्शन होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. इजिप्तमध्ये सर्जरीची सुरुवात झाली असे मानल्या जाते व तेही शुद्ध वातावरणातच अशा वैद्यकीय प्रक्रिया पार पाडत असत. भारतातही ऋषिमुनीद्वारे होणारे वैद्यकीय उपचार विशिष्ट वातावरणात केले जायचे. यावरून शुद्धतेचे महत्त्व लक्षात येते. केवळ रुग्णालय चकाचक करून चालत नाही तर तेथे शुद्ध हवा खेळत राहणे आवश्यक आहे. इतर कार्यालयांबाबतही तीच स्थिती गरजेची आहे. अंतर्गत तापमान २२ डिग्री व आर्द्रता ५० ते ६० टक्के आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. १८ व्या शतकात हवा शुद्धीकरणासाठी अल्ट्राव्हायलेट दिव्यांचा उपयोग केला जायचा, पण त्याचे दुष्परिणाम दिसून आले. मात्र आता तंत्रज्ञान विकसित झाले असून युव्ही लॅम्प इमारतींची अंतर्गत हवा शुद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती केदार पत्की यांनी दिली.

टॅग्स :environmentवातावरण