शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तो विदर्भासोबत भेदभाव ठरत नाही, आषाढीला केवळ मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:05 IST

पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली

ठळक मुद्देपंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली

नागपूर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा जपण्यासाठी यंदा मनाच्या दहा पालख्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाच्या विरोधात दाखल याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे, केवळ १० मानाच्या पालख्याच आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जातील असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. 

पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली. सरकारने विदर्भासोबत भेदभाव केला हा याचिकाकर्त्यांचा आरोप निराधार असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, आषाढी एकादशीचा सोहळा यंदाही साधारपणे आणि मानाच्या पालख्यांच्या उपस्थितच पार पडणार आहे. 

बसमधून जाणार पालख्या

प्रत्येक पालखीला दोन बसमधून ६० वारकऱ्यांसह प्रवास करता येणार आहे. मात्र, ६० वारकऱ्यांची नवे ही त्या-त्या संस्थानने निश्चित करण्याचा निर्णय घ्यायची आहे. त्यामुळे यंदाही वारीचा सोहळा वाखरी तळापर्यंत एसटी बसनेच होणार आहे. देहू येथून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे.

६० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा

जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही एसटी बसनेच होणार आहे. मात्र, मागील वर्षी केवळ २० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. यंदा मात्र, त्यात वाढ करून दोन बसमधून ६० वारकऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, प्रत्येक वारकऱ्याची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. 

10 मानाच्या पालख्यांनाच परवानगी

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत चांगा वटेश्वर, संत निळोबाराय, संत नामदेवराय आधी राज्यातील दहा पालखी सोहळ्याला प्रत्येकी दोन बसमधून ६० वारकऱ्यांना वाखरी तळापर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर