शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

तो विदर्भासोबत भेदभाव ठरत नाही, आषाढीला केवळ मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:05 IST

पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली

ठळक मुद्देपंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली

नागपूर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा जपण्यासाठी यंदा मनाच्या दहा पालख्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाच्या विरोधात दाखल याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे, केवळ १० मानाच्या पालख्याच आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जातील असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. 

पंढरपुरात राज्यातील इतर विभागातून येणाऱ्या पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका न्यायलयाने फेटाळून लावली. सरकारने विदर्भासोबत भेदभाव केला हा याचिकाकर्त्यांचा आरोप निराधार असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, आषाढी एकादशीचा सोहळा यंदाही साधारपणे आणि मानाच्या पालख्यांच्या उपस्थितच पार पडणार आहे. 

बसमधून जाणार पालख्या

प्रत्येक पालखीला दोन बसमधून ६० वारकऱ्यांसह प्रवास करता येणार आहे. मात्र, ६० वारकऱ्यांची नवे ही त्या-त्या संस्थानने निश्चित करण्याचा निर्णय घ्यायची आहे. त्यामुळे यंदाही वारीचा सोहळा वाखरी तळापर्यंत एसटी बसनेच होणार आहे. देहू येथून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे.

६० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा

जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही एसटी बसनेच होणार आहे. मात्र, मागील वर्षी केवळ २० वारकऱ्यांना प्रवासाची मुभा दिली होती. यंदा मात्र, त्यात वाढ करून दोन बसमधून ६० वारकऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, प्रत्येक वारकऱ्याची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. 

10 मानाच्या पालख्यांनाच परवानगी

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत चांगा वटेश्वर, संत निळोबाराय, संत नामदेवराय आधी राज्यातील दहा पालखी सोहळ्याला प्रत्येकी दोन बसमधून ६० वारकऱ्यांना वाखरी तळापर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर