शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेहंदीबाग आरयूबीसाठी पाईपलाईन हटविण्याचा कार्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:01 IST

मेहंदीबाग येथील रोड अंडर ब्रिज (आरयूबी)करिता पाणी पाईप लाईन हटवावी लागत असून त्याकरिता कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात माहिती : अतिक्रमणही हटविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेहंदीबाग येथील रोड अंडर ब्रिज (आरयूबी)करिता पाणी पाईप लाईन हटवावी लागत असून त्याकरिता कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.न्यायालयाने ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत दिली होती. तसेच, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला महापालिकेने आवश्यक सहकार्य करावे असे सांगितले होते. त्यानंतर रेल्वेने महापालिकेला ‘आरयूबी’च्या मार्गातील ड्रेनेज लाईन व पाणी पाईप लाईन हटविण्यास सांगितले. तसेच, महापालिकेला या कामासाठी १ कोटी ८६ लाख रुपये अदा केले. त्यानंतरही महापालिकेने हे काम केले नाही. तसेच, यासंदर्भात देण्यात आलेल्या स्मरणपत्रांचीही दखल घेतली नाही. परिणामी ‘आरयूबी’चे काम रखडले. दिलेल्या मुदतीत ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल करून ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.या मुद्यावरून न्यायालयाने मनपाला नोटीस बजावली असता त्यांनी या कामासाठी डिमार्केशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, कार्यादेश जारी झाला असल्यामुळे डिमार्केशननंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे स्पष्ट केले. त्यावर रेल्वेने येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत डिमार्केशन करून देण्याची ग्वाही दिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी ही बाब लक्षात घेता प्रकरणावर १८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर, रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट तर, मनपातर्फे अ‍ॅड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.कृती समितीची होती याचिकायासंदर्भात खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीने जनहित याचिका दाखल केली होती. मेहंदीबाग रेल्वे फाटकावर यापूर्वी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्यात आला आहे. परंतु, परिसरातील नागरिकांना या पुलावरून गेल्यास ‘यू टर्न’ घेऊन घराकडे जाणे अडचणीचे आहे. परिणामी, परिसरातील नागरिक रेल्वे फाटकातूनच जात होते. रेल्वे फाटकाजवळ दोन्ही बाजूने केवळ १३ फुटाचा मार्ग होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे न्यायालयाने ‘आरयूबी’ बांधण्याचा आदेश दिला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका