शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शांतीचं प्रतीक आता संकटाचं कारण? कबुतरांवरून वाद पेटला!

By मंगेश व्यवहारे | Updated: August 11, 2025 15:22 IST

Nagpur : निसर्गाच्या अन्नसाखळीतील तोही एक जीव आहे, त्याला उपाशी कसे ठेवता येईल

मंगेश व्यवहारेनागपूर : मुंबईच्या कबुतरखान्याचा वाद कबुतरांच्या जिवावर उठला आहे. माणसाळलेला हा पक्षी जंगलापेक्षा शहरात, वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळेच मुंबई, हैद्राबाद, लखनौ, कानपूर, दिल्ली, ओडिशा या भागांत कबूतरखाने बघायला मिळतात. मात्र, अचानक हे कबूतर माणसाच्या आरोग्यावर उठले आहे. न्यायालयांपर्यंत हा वाद गेला आहे.

पण कबूतर तर हा प्राचीन काळापासून मानवाचा सहकारी राहिला आहे. त्याला अमन, शांती, प्रेमाचे प्रतिक मानले गेले आहे. संदेश वाहक म्हणून त्याचा वापर केला जात असल्याचे ऐतिहासिक दाखले आहे. कबूतर इतका मानसाळलेला आहे की, त्याला पाळीव पक्षांप्रमाणे पाळले जाते. कालऔघात त्याची उपयोगिता आता बदलली असून, त्याच्यावर आता जुगार देखील खेळला जातोय. असा हा गुटर गु.. करणाऱ्या पक्ष्यांची जगात ५० हून अधिक प्रजाती आहे. त्यातील १२ हून अधिक प्रजाती भारतात आढळतात. 

कबुतरांच्या संदर्भात ऐतिहासिक दाखले आढळतात

  • इजिप्त, पर्शिया आणि रोम साम्राज्यात कबुतरांचा वापर संदेश पोहोचवण्यासाठी केला जात असे. युद्धकाळात कबूतरांचा हॉमिंग पिजन म्हणून वापर होत असे. ते लांब पल्ल्याचे संदेश सुरक्षितपणे नेऊ शकत होते.
  • भारताचा संदर्भ मुघल सम्राट अकबराच्या काळात "हवा महल" सारखी कबुतर पोस्ट व्यवस्था होती. मराठा साम्राज्यातही युद्धातील संदेश जलद पोहोचवण्यासाठी कबूतरांचा वापर केला जात असे.
  • इस्लामिक संस्कृतीत मक्का-मदिना परिसरात कबुतरांना पवित्र मानले जाते. त्यांना इजा पोहोचवणे पाप समजले जाते.
  • ख्रिश्चन धर्मात कबूतर हे शांती आणि पवित्र आत्याचे प्रतिक आहे.
  • हिंदू धर्मातही कबूतराला शांतता, करुणा आणि सत्कर्माचे प्रतिक मानले जाते.

धार्मिक भावना जुळलेल्या आहेमुंबईतील कबूतरखान्यांची सुरुवात धार्मिक भावनेतून झाली आहे. जैन आणि गुजराती समाजातील व्यक्तींनी पुण्याची भावना बाळगून कबूतरांना दाणा वाटण्यासाठी "चबुतरे" तयार केले. पुढे ते "कबूतरखाने" म्हणून विकसित झाले. मुंबईतले अनेक कबूतरखाने मुंबईच्या जैन मंदिराजवळ उभारण्यात आले आहे. कबुतरखान्यांना १०० वर्षे झाले आहे. हे आज हेरिटेज म्हणूनही ओळखले जातात.

"जवळपास नागपुरातही लोकांकडून कबुतरखाने आहे. हा जीवच मुळात माणसाळलेला आहे. त्याच्या दिर्घकालीन सान्निध्यात राहिल्यास आणि काळजी न घेतल्यास श्वसनाचे आजार होऊ शकतात. पण, हॅण्डवॉश केल्यास तोंडाला मास्क लावल्यास आजारांपासून सहज बचाव करता येते. निसर्गाच्या अन्नसाखळीत प्रत्येक जीव एकमेकांवर निर्भर आहे. वर्षानुवर्षांपासून मानवाचा सखा असलेला कबुतर जिवावर उठणार नाही. त्यामुळे त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही."- डॉ. हेमंत जैन, ज्येष्ठ पशुपक्षीतज्ज्ञ

टॅग्स :nagpurनागपूर