शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
5
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
6
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
7
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
8
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
9
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
10
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
11
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
12
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडले, मुख्य सचिव हायकोर्टाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:01 IST

Nagpur : तीन आठवड्यांत मागितले सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प रखडले असून, हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काय केले जात आहे, याची समाधानकारक माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी गेल्या दोन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये सादर केली नाही. त्यामुळे न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त करून यासंदर्भात येत्या तीन आठवड्यांत सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश मुख्य सचिवांना दिला. तसेच, यावेळी टाळाटाळ केल्यास अवमान कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली.

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सामान्य प्रशासन, नगर विकास, महसूल व वने आणि पाटबंधारे विभाग यांनी एकमेकांसोबत समन्वय ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे. याकरिता, मुख्य सचिवांनी आवश्यक भूमिका वठवून न्यायालयासमक्ष सर्वसमावेशक माहिती सादर करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांनी याचिकेतील मुद्द्यांवर अद्याप न्यायालयाने समाधान केले नाही. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अविनाश काळे व अॅड. भारती दाभाडकर यांनी कामकाज पाहिले.

असे आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे२०१५ मध्ये राज्य सरकारने विदर्भातील सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती. परंतु, परिस्थितीत अद्याप समाधानकारक बदल झाला नाही. डॉ. व्ही. एम. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विदर्भात ३८ टक्के सिंचन अनुशेष असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर १९९५ मध्ये संबंधित समितीने विदर्भात ५५ टक्के सिंचन अनुशेष असल्याचा अहवाल दिला. ही बाब लक्षात घेता विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण होण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय