शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:39 PM

सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी : संरक्षणाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने महावितरणला शहरातील जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे कर्मचारी घाबरले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच चिंतेने सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरणाची व्यवस्था एसएनडीएलकडे आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी महावितरणला एक पत्र पाठवून कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासही अडचण येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची माहिती होताच कर्मचारी आपल्या भविष्याबाबत घाबरलेले आहेत.त्यांनी सोमवारी ऊर्जामंत्र्यांना आपल्या समस्या सांगत निवेदन सादर केले. त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनी काम सोडून गेल्यास ते बेरोजगार होतील. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात पगारात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यांना पीएलपीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के वेतन दिले जाते. कंपनी व्यवस्थापनातर्फे लिखित आश्वासन मिळाल्यानंतरही त्यांना पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे ते आपल्या पगारापासूनही वंचित होत आहेत. त्यांच्याविरुद्ध बदल्याच्या भावनेने कारवाई होऊ नये. ते पूर्ण इमानदारीने काम करू इच्छितात. त्यांना केवळ आपल्या भविष्याची चिंता आहे.प्रादेशिक संचालक ऐकणार समस्याऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की, सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यांनी महावितरणचे कार्यकारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांना फोन करून कर्मचाºयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.चर्चा योग्य दिशेने सुरूएसएनडीएल कंपनीची महावितरण आणि बँकांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनी केवळ आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंतेत आहे. कंपनीने परिस्थिती पाहून महावितरणला केवळ काही सवलती मागितल्या आहेत. बँकांनाही कमी व्याजावर कर्ज देण्याची विनंती केली आहे. ही चर्चा ज्या दिशेने सुरू आहे त्यावरून परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास आहे.सोनल खुराणाबिझनेस हेड , एसएनडीएल

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी