शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकरी मृत्यूंच्या चौकशीसाठी नवीन एसआयटी स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 9:12 PM

राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देकीटकनाशकांचे बळी : हायकोर्टात अर्ज : शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला.नवीन एसआयटी स्थापन केल्यानंतर तिला चौकशी पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करून देण्यात यावा, चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात यावा, चौकशीत दोषी आढळणारे शासकीय अधिकारी व कीटकनाशके उत्पादक कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्यूंची थातूरमातूर चौकशी करून डोळ्यांत धूळफेक करणारा अहवाल देणाऱ्या एसआयटीमधील अमरावती विभागीय आयुक्त (अध्यक्ष) व अन्य सदस्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि या एसआयटीचा अहवाल रद्द करण्यात यावा अशी विनंतीही जम्मू आनंद यांनी या अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी हा अर्ज रेकॉर्डवर घेऊन राज्य शासनाला यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. जम्मू आनंद यांची यासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे तर, शासनातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्नअमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीचा अहवाल शेतकरी व शेतमजुरांची थट्टा करणारा आहे. कर्तव्यात कसूर करणारे शासकीय अधिकारी व बोगस कीटकनाशके बाजारात विकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात अहवालात काहीच म्हटल्या गेले नाही. उलट, शेतकरी व शेतमजुरांवरच गुन्हे नोंदविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यावरून या प्रकरणात मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते असा आरोप जम्मू आनंद यांनी केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी