शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्रेरणादायी! ४६ वर्षांपासून सायकलने दूध वाटून गौरीबाईंनी सावरला संसाराचा प्रपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:39 IST

समाजातून महिलादिनी अश कष्टकऱ्यांचाही सन्मान व्हायला हवा

दयानंद पाईकराव

नागपूर : दोन मुली झाल्यामुळे पतीने घराबाहेर काढले. १३ दिवसांची मुलगी असताना गौरी प्रपंचे यांच्यावर आभाळ कोसळले. परंतु न डगमगता त्यांनी जगण्याचा आधार शोधला. सायकलवर दूध वाटणे सुरू केले अन् गेल्या ४६ वर्षांपासून त्या सायकलवर दूध वाटून, धुणीभांडी करून कोणापुढे हात न पसरता आपला संसार चालवित आहेत.

गौरी मारोतराव प्रपंचे (६६, गोपाळनगर पहिला बसस्टॉप) असे या कणखर महिलेचे नाव आहे. गौरी यांना दोन मुली झाल्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढले. दोन मुलींना घेऊन काय करावे, कुठे राहावे, मुलींचे पालनपोषण कसे करावे, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. परंतु धीर न सोडता त्यांनी जगण्यासाठी धडपड केली. १९७८ मध्ये ४५ पैशांना दुधाची बाटली असताना सायकल घेऊन त्यांनी घरोघरी दूध वाटणे सुरू करून मुलींचे पालनपोषण केले. पुढे पाच वर्षांनी पुन्हा त्यांचा पती आला आणि ते एकत्र राहू लागले. त्यानंतर त्यांना पुन्हा एक मुलगा आणि मुलगी झाली. परंतु पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे गौरी यांच्यावरच घराची जबाबदारी होती. २००४ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. गौरी यांनीच तीनही मुलींचे लग्न लावून दिले.

मुलाचेही लग्न केले. परंतु मुलगाही खास काही करीत नसल्यामुळे गौरी यांच्या नशिबात कामापासून निवृत्ती म्हणतात ती आलीच नाही. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात. नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दु:ख, त्यांनी केलेले कष्ट आणि आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.

धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी

  1. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात.
  2. नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
  3. आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दुःख त्यांनी केलेले कष्ट आणि ३ आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.
टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर