शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

प्रेरणादायी! ४६ वर्षांपासून सायकलने दूध वाटून गौरीबाईंनी सावरला संसाराचा प्रपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:39 IST

समाजातून महिलादिनी अश कष्टकऱ्यांचाही सन्मान व्हायला हवा

दयानंद पाईकराव

नागपूर : दोन मुली झाल्यामुळे पतीने घराबाहेर काढले. १३ दिवसांची मुलगी असताना गौरी प्रपंचे यांच्यावर आभाळ कोसळले. परंतु न डगमगता त्यांनी जगण्याचा आधार शोधला. सायकलवर दूध वाटणे सुरू केले अन् गेल्या ४६ वर्षांपासून त्या सायकलवर दूध वाटून, धुणीभांडी करून कोणापुढे हात न पसरता आपला संसार चालवित आहेत.

गौरी मारोतराव प्रपंचे (६६, गोपाळनगर पहिला बसस्टॉप) असे या कणखर महिलेचे नाव आहे. गौरी यांना दोन मुली झाल्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढले. दोन मुलींना घेऊन काय करावे, कुठे राहावे, मुलींचे पालनपोषण कसे करावे, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. परंतु धीर न सोडता त्यांनी जगण्यासाठी धडपड केली. १९७८ मध्ये ४५ पैशांना दुधाची बाटली असताना सायकल घेऊन त्यांनी घरोघरी दूध वाटणे सुरू करून मुलींचे पालनपोषण केले. पुढे पाच वर्षांनी पुन्हा त्यांचा पती आला आणि ते एकत्र राहू लागले. त्यानंतर त्यांना पुन्हा एक मुलगा आणि मुलगी झाली. परंतु पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे गौरी यांच्यावरच घराची जबाबदारी होती. २००४ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. गौरी यांनीच तीनही मुलींचे लग्न लावून दिले.

मुलाचेही लग्न केले. परंतु मुलगाही खास काही करीत नसल्यामुळे गौरी यांच्या नशिबात कामापासून निवृत्ती म्हणतात ती आलीच नाही. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात. नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दु:ख, त्यांनी केलेले कष्ट आणि आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.

धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी

  1. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या असल्या तरीसुद्धा गोपालनगर, अभ्यंकरनगर, माधवनगर, बजाजनगर परिसरात दूध वाटतात. त्यांचा मुलगा कामाच्या शोधात मुंबईला गेला आहे. सध्या गौरी या सून आणि नातीसह राहतात.
  2. नातही कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्यामुळे तिच्या शिक्षणाची जबाबदारी गौरी यांच्यावरच असल्यामुळे आजही त्या जीवापाड मेहनत करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
  3. आजपर्यंत त्यांच्या वाटाला आलेले दुःख त्यांनी केलेले कष्ट आणि ३ आजही सुरू असलेली त्यांची धडपड खरोखरच वाखाणण्यासारखी तर आहेच पण इतरांनीही प्रेरणा घ्यावी, अशीच आहे.
टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर