शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

शेतकऱ्यांची थट्टा उडविणाऱ्या विमा कंपन्यांची चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:50 PM

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रुपया, दोन रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश मिळेल, यासंबंधीचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री खोत यांची घोषणा : शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रुपया, दोन रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश मिळेल, यासंबंधीचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी विधानसभेत दिली.विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री खोत यांनी ही ग्वाही दिली. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक आणि मावा-तुडतुडाग्रस्त धान उत्पादकांना मदत देण्यासाठी ३,४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला होता. मात्र, अद्याप केंद्राकडून मदत न मिळाल्याने राज्य शासनाने या मदतीचा १००९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती खोत यांनी यावेळी दिली. पीक विम्यांतर्गत नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ११२६ कोटी रुपये देण्यात आले असून, येत्या काळात ११ हजार ९०० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाईसाठी ७ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या सुनावणी पूर्ण झाल्या असून, १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना सुमारे ९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश ४१ कंपन्यांना देण्यात आले असल्याचे खोत यांनी सांगितले. कंपन्यांनी भरपाई न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 विरोधकांनी घेरले, अध्यक्षांनीही खडसावले  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून १ रुपया, २ रुपये अशी नुकसान भरपाई मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्री सदाभाऊ खोत यांना उत्तर न देता आल्याने विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले. वारंवार एकच उत्तर येत असल्याने  विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘खोत यांना तुमच्या विभागाने ही माहिती यापूर्वीच घ्यायला हवी होती’ या शब्दात खडसावले. विमा कंपन्यांनी नेमक्या कोणत्या आधारे ही मदत शेतकऱ्यांना दिली, याची चौकशी करा, असे आदेशच विधानसभ अध्यक्षांना यावेळी द्यावे लागले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही या वादात उडी घेतली. पीक विमा योजना ही विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी आणलेली नाही, असे नमूद करताना नुकसान भरपाईच्या नावावर कंपन्यांनी शेतकऱ्यांची टिंगल चालविली असल्याचे म्हणत खडसे यांनीही धारेवर धरले. विमा कंपन्यांकडून शेतकºयांची थट्टा करणाऱ्या या प्रकरणांची राज्य सरकारकडून निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे सांगताना नुकसान भरपाईचा धनादेश किमान ५०० रुपयांचा असावा, याच्याही सूचना दिल्या जाणार असल्याचे राज्यमंत्री खोत यांनी यावेळी सांगितले.

तोपर्यंत विधानसभा सोडणार नाहीबोंडअळी, मावा व तुडतुड्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये जाहीर झालेली मदत सरकार कधी देणार, याची तारीख जाहीर होईस्तोवर आपण विधानसभेचे सभागृह सोडणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सरकारला दिला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार मुळीच गंभीर नाही, असे सांगताना सरकार सातत्याने वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप विखे यांनी केला. 

विरोधकांचा सभात्याग  दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी रात्री उशिरा सभागृहात येऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्तरात नवीन काहीच नसल्याने विरोधकांचे समाधान झाले नााही. त्यांनी शासनाचा निषेध करीत सभात्याग केला. 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी