शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जल, पर्यावरण संवर्धनासाठी संघ घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 2:38 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले.

ठळक मुद्देसमाजाला सोबत घेऊन चळवळ राबविणार रुपरेषा तयार करण्याची प्रांतांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. समाजाला सोबत घेऊन याबाबत देशपातळीवर चळवळ राबविण्याचा संकल्प यात घेण्यात आला. तसेच देशात प्रांतनिहाय रुपरेषा तयार करण्याची सूचनादेखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आंध्र प्रदेशमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह संघ परिवारातील व समाजातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यात उपस्थिती होती. या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शिक्षणक्षेत्राची स्थिती, कृषी, पर्यावरण यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन हा महत्त्वाचा विषय होता. केवळ शासनपातळीवर पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही. शाश्वत तोडग्यासाठी समाजाला घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. संघाकडून देशातील काही क्षेत्रात जलसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र याचा आता विस्तार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि जनतेला जोडण्यासाठी पाऊल उचलले गेले पाहिजे, असे ठरविण्यात आले. जल व पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय प्रकल्प राबविता येतील, तसेच कुठे जास्त प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर उपाययोजनांसाठी चळवळ उभारावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जैविक कृषी पद्धतीचा सुरू आहे प्रचार-प्रसारमागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात भोपाळ येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत जैविक कृषीपद्धतीच्या प्रचार-प्रसाराचा निर्णय झाला होता. यानुसार देशातील अनेक क्षेत्रात संघाचे प्रकल्प सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केरळ पुनर्वसनासाठी शक्य ती मदत करणारसेवा भारतीच्या माध्यमातून घरांची डागडुजी, पुनर्वसन यासाठीदेखील संघाकडून मदत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत केरळमध्ये ३०० मदत शिबिरांच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. एक लाखाहून अधिक स्वयंसेवक मदतकार्याला लागले आहेत, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWaterपाणी