शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर जिल्ह्यात जन्मदाताच ठरला काळ; बारशावरून झालेल्या भांडणात चिमुकल्याने गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 12:06 IST

नवजात बाळाला वडिलांनी कानशीलात थप्पड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव (आशीर्वाद) येथे शनिवारी घडली.

ठळक मुद्दे कळमेश्वर तालुक्यातील खडगाव येथील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : बाळाच्या (मुलगा) नामकरण कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, यावरून पती - पत्नीत वाद झाला. त्यातच पत्नी रागाच्या भरात बाळाला सोडून निघून गेली. काही वेळाने तिला बाळ मृतावस्थेत पडले असल्याचे आढळून आले. चौकशीअंती त्या नवजात बाळाला पतीने अर्थात बाळाच्या वडिलांनी कानशीलात थप्पड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलास अटक केली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगाव (आशीर्वाद) येथे शनिवारी घडली.शंकर नरेंद्र ऊर्फ नरेश घोरपडे (२२, रा. खडगाव, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. शंकर व अर्चना यांचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला. अर्चनाने १ महिना १५ दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला.या नवजात बाळाच्या नामकरण कार्यक्रमाला अर्चनाच्या माहेरच्या मंडळीला बोलावू नये, या कारणावरून शंकर व अर्चना यांच्यात भांडण झाले. त्यामुळे अर्चना रागाच्या भरात बाळाला घरात ठेवून बाहेर निघून गेली. काही वेळाने तिने बाळाला जवळ घेतले असता बाळ तिला मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.संशय आल्याने अर्चनाने बाळाला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्या बाळाची कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, डोक्याला इजा झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शंकरची आई छाया नरेश घोरपडे (५५, रा. खडगाव) हिला विचारणा केली असता, शंकरने बाळाच्या कानशीलात थप्पड मारल्याचे तिने पोलिसांना सांगितले.परिणामी, कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३०४ अवये गुन्हा नोंदवून बाळाचे वडील शंकर घोरपडे यास रविवारी रात्री अटक केली. न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत (दि. २१) पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पाल करीत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हे