शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:08 AM

भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

ठळक मुद्देमीडिया महासंमेलनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या मीडिया विभागातर्फे ओमशांति मीडिया या पाक्षिकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य वक्ता म्हणून साधना पथ साप्ताहिकाचे माजी संपादक बी.के.अनुज, ओम शांती मीडियाचे चीफ एडिटर बीके.गंगाधर, धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एक आहे. विश्व हेच एक कुटुंब आहे, ही संकल्पना ब्रह्माकुमारीज् १९३६ पासून मांडत आहे. भारत अविनाशी खंड आहे. भारतीय संस्कृतीच्या आधारावरच हे म्हणण्यात येते की भारत होता, आहे आणि असेल. भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल स्वरूपाची राहिली आहे. वर्तमान स्थितीतील शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत. शरीर हेच मंदिर आहे हे कुणीच शिकवत नाही, असे बीके करुणाभाई म्हणाले.पत्रकारिता आणि आध्यात्मिकता वेगवेगळे राहू शकत नाही. आपल्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे. मात्र मनातील वृत्ती बदलणे आणि मनातील वैरभावनेला दूर करून शुद्ध करणे हे शक्य झालेले नाही. जर आपल्या मनात जगाच्या कल्याणाची भावना असेल तर लेखनीतदेखील तशीच शक्ती प्राप्त होईल, असे प्रतिपादन बी.के.गंगाधर यांनी केले. नवीन भारताच्या निर्माणात मीडियाचे मौलिक योगदान आहे. कायदे आपण बदलू शकत नाही, मात्र त्याला नैतिकतेमध्ये बदलू शकतो. केवळ परमात्माच आपल्याला सुरक्षा देऊ शकतो, असे मत अनुजभाई यांनी व्यक्त केले.नागपूर सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी रजनी दीदी व डॉ.बबन नाखले यांनीदेखील मत मांडले. बीके रक्षा दीदी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन बीके वर्षाबहन व बीके अनुजभाई यांनी केले. बीके मनीषा दीदी यांनी राजयोगाची अनुभूती सर्वांना करवून दिली. बीके प्रेमप्रकाश यांनी आभार मानले.

टॅग्स :IndiaभारतTeacherशिक्षकMediaमाध्यमे