शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

इंडिया आघाडी, फेविकॉल से भी नही जुडेगा..! प्रफुल्ल पटेल यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 2, 2023 18:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

नागपूर : विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत ‘जेथे शक्य असेल तेथे आघाडी करून लढू, असा ठराव घेण्यात आला. मात्र, यांना अनेक राज्यात एकमेकांविरोधात लढावेच लागेल. इंडिया आघाडी पूर्णपणे विस्कळित झाली आहे. ‘जुडेंगे नही तो जितेंगे कैसे, ये तो फेविकॉल से भी नही जुडेगा’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.

अजित पवार गटाचा शनिवारी नागपुरातील देशपांडे सभागृहात संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आ. राजेंद्र जैन, नाना पंचबुद्धे आदी उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विरोेधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीला आपण होतो. या, बसा व जेवन करून जा, अशी ती बैठक होती. त्याच वेळी हे काही जुळणार नाही हे आपल्या लक्षात आले होते. आता मुंबईच्या तिसऱ्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगो ठरविण्यासाठी एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे लोगोचे लोकार्पण झाले नाही. यांचा समन्वयक ठरला नाही. शेवटी १३ लोकांची समिती ठरावी लागली. दुसरीकडे देशातील जनतेला विश्वास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यामुळे जगात देशाचा सन्मान वाढला आहे, अशी तुलनात्मक प्रशंसा पटेल यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, आभा पांडे, सतीश शिंदे, नरेश अरसडे, राजेश माटे, विश्वाल खांडेकर आदी उपस्थित होते.

आता भाजपसोबत गेलो तर चुक काय ?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत बसायला तयार नव्हती. आम्ही काँग्रेसला समजावले. त्यावेळी सत्तेतून लोकांची कामे करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो. मग आज त्याच उद्देशाने आम्ही भाजपसोबत गेलो तर काय चुक केली, असा सवालही पटेल यांनी केला.

अजित पवारांवर आमदारांना विश्वास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास असल्यामुळेच ५३ पैकी ४३ आमदार सोबत आले आहेत. त्यांच्या त्यांचे भविष्य अजित पवारांकडे सुरक्षित वाटत आहे. ८ सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसात निकाल येईल. पक्ष व चिन्ह हे दोन्ही आपल्याकडेच राहतील, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्रीपदाची संधी गमावली- २००४ मध्ये काँग्रेसच्या ६९ तर राष्ट्रवादीच्या ७१ जागा निवडून आल्या. तरी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. गेल्या निवडणुकीत ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन ५४ आमदार राष्ट्रवादीला नंतरची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देता आले असते. पण तसेही झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी आली, पण ती गमावली. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ थांबली, असा ठपकाही पटेल यांनी ठेवला.

टॅग्स :PoliticsराजकारणPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAjit Pawarअजित पवार