शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

मराठी साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच वाढले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 7:39 PM

शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.

ठळक मुद्देसातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश : मराठी साहित्य संमेलनाला मिळणार ५० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात दुप्पटीने वाढ करीत पुढील वषार्पासून ते ५० लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बडोदा येथे ९१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा मराठी साहित्य महामंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश आहे. राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरेसे नाही. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडे पाठवला होता. परंतु त्यावर सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. पण, म्हणून महामंडळाने आपले प्रयत्न सोडले नाहीत. या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा करणारा पत्रव्यवहार सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी केला गेला. शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.ही घोेषणा सांस्कृतिक परिवर्तनाची द्योतकसंमेलनाचे अनुदान वाढवून मिळावे, यासाठी विदर्भ साहित्य संघाने नेहमीच प्रयत्न केले. साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे आल्यामुळे या मागणीला आणखी बळ मिळाले. हे निश्चितच महामंडळाच्या प्रयत्नाचे यश आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.डॉ. इंद्रजित ओरकेकार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी साहित्य संमेलनासाठी शासन मागच्या २५ वर्षांपासून २५ लाखांचा निधी देत होते. परंतु सध्याच्या बाजारभावानुसार ही रक्कम एक कोटी इतकी हवी. म्हणूनच महामंडळ मागच्या एक वर्षापासून सातत्याने ही मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बडोद्यात हे अनुदान ५० लाख करीत असल्याची घोषणा केली. या घोषणेचा आनंद आहेच व त्यासाठी मी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. परंतु संमेलनाचे स्वरूप बघता हा निधी अजूनही कमीच आहे. यात पुन्हा ५० लाखांची भर घातली जावी, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीअध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी विद्यापीठाचा प्रश्नही मार्गी लागणारमराठी भाषेच्या संदर्भातील अनेक मागण्यांचा अनुशेष सरकारकडे कायम आहे. यात मराठी विद्यापीठाचाही समावेश आहे. ही मागणी तशी ८४ वर्षे जुनी आहे. आता कुठे शासन याबाबतीत सकारात्मक दिसत आहे. बडोदा साहित्य संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे. यासोबतच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांच्या पुढकाराने साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य