शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवा, सम्यक विद्यार्थी आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: August 5, 2023 17:06 IST

संविधान चौकात निदर्शने

नागपूर : राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ७५ वरून ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सम्यक विद्यार्थीआंदोलनातर्फे संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

राज्य शासनातर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बाहेर देशात शिक्षण घेता यावे करिता प्रत्येक वर्षी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी फक्त ७५ विद्यार्थ्यांना देण्यात येते. जवळपास १३ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १२ टक्के म्हणजेच जवळपास १.५ कोटी इतकी आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती करिता असलेली विद्यार्थी संख्या फारच कमी आहे.अनुसूचित जाती मधील अनेक गुणवान व होतकरू विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात. परंतु आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे अनुसूचित जाती चे गुणवंत विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षाणापासून वंचित राहतात. त्यामुळे ही संख्या किमान ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.

आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे व समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अथांग कोरडे ,धम्मदीप लोखंडे अनिकेत मेश्राम ,रोहित भगत ,रोहित डोंगडे ,मंथन गजभिये, अक्षय खोब्रागडे, रक्षक पाटिल, रसिका,ग्रीष्मा नरनवरे ,संकेत ढोणे,प्राजक्ता सुखदेवे, रशिका, क्षितिज मेश्राम, दिपांकर कांबळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीagitationआंदोलन