शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यात ऑक्टोबर महिन्यात कुपोषणामुळे ८५२ बालकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:37 IST

नाशिक शहरात सप्टेंबर महिन्यात कुपोषणामुळे दोन महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता

मुंबई - एकीकडे महाराष्ट्र १ ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहात आहे. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य होणार असल्याचं राज्याच्या प्रमुखांकडून सांगण्यात येतं. मात्र, दुसरीकडे आजही कुपोषणामुळे शेकडो बालकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. कुपोषणाच्या गंभीर समस्येवर शासनस्तरावरून सातत्याने उपाययोजना सुरू असतात. मात्र, अद्यापही कुपोषणाचा नायनाट करण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

नाशिक शहरात सप्टेंबर महिन्यात कुपोषणामुळे दोन महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, मेळाघाट आणि आदिवासी भागातील बालकांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. त्यामुळे, शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे आणि योग्य ती उपाययोजन करणे गरजेचे आहे. त्यातच, ऑक्टोबर महिन्यात कुपोषणामुळे राज्यात तब्बल  ८५२ बालमृत्यूंची नोंद झाल्याचं वाचण्यात आलं, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील अनेक प्रश्नांकडे विरोध लक्ष वेधत आहेत. आज जयंत पाटील यांनी कुपोषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. 

''राज्यात ऑक्टोबर महिन्यात कुपोषणामुळे तब्बल ८५२ बालमृत्यूंची नोंद झाल्याची बाब वाचनात आली. ही बाब फार चिंताजनक आहे. राज्यकर्त्यांना आकड्यांची जुळवाजुळव आणि पत्रप्रपंचातून वेळ मिळाला तर त्यांनी या परिस्थितीकडे लक्ष द्यावे. महागाई व अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा हेच या सर्वांचे मूळ आहे,'' असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, सरकारनं तातडीने यावर उपाययोजना राबवून अंमलबजावणी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरुन आणि त्यांच्या भूमिकेवरुन रणकंदन होताना दिसत आहे. राज्यातील मूळ प्रश्न बाजुला राहून आरोप-प्रत्यारोपांवर चर्चा होऊन एकमेकांवर टीका-टीपण्णीच होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे, जनतेच्या प्रश्नांबाबत खरंच सत्ताधारी आणि विरोधकही गंभीर आहेत की नाहीत, हाही खरा प्रश्न आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर