शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:28 IST

मराठा आरक्षण प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.

Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात आक्रमक आंदोलन उभे राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. "मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं जाईल," असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.  

"मराठा आरक्षणासंदर्भात २४ तारीख ही शेवटची तारीख होती आणि त्या आधीच सरकारने निर्णय घ्यावा यासंदर्भात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आता पुन्हा वेळ मारून घेण्याचा प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचे गाजर दाखवण्यात आलेलं आहे. जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर, विशेष अधिवेशन घेणे आणि धोरणात्मक निर्णय घेणे हे कायद्याने शक्य होणार नाही," असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल केला आहे.

"किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील, असं वाटलेलं"

सरकारकडून भ्रमनिरास झाल्याचं सांगताना जयंत पाटील म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात आज जो प्रस्ताव होता, त्यात इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतेही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. जे वकील हाय कोर्टात होते तेच सुप्रीम कोर्टात होते त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षणाची आणि गायकवाड समितीची बाजू सरळ मांडली नाही हा जो त्यांनी उल्लेख केला तो धादांत खोटा आहे, कारण महाराष्ट्रात जे हायकोर्टात वकील होते तेच आमचे सरकार असताना सुप्रीम कोर्टात होते, त्याचबरोबर सरकारच्या वतीने आम्ही सरकारला काही मागण्या केल्या होत्या. आम्ही सर्वांनी भाषणांमध्ये मुद्दे मांडले होते त्याबद्दल न बोलता मागे अडीच तीन वर्षात ज्या काही सोयी, सवलती दिलेल्या, ज्या काही चालू आहेत, काही चालू नाहीत त्या सवलतींवर मुख्यमंत्र्यांनी बोलून वेळ मारून नेली. सरकारकडे काही ठोस नाही, हे त्यांच्या भाषणाचा टोन बघता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं पण, आम्ही शांतपणे त्यांचे भाषण ऐकलं कारण, उत्सुकता होती किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

"मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तर नाही"  

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत ओबीसींच्या अनेक योजनांसाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. "आज महाराष्ट्रात कुणबी समाजाचे ओबीसी व कुणबी सर्टिफिकेट देण्याचे प्रमाण जे आहे ते किती आहे ? त्याची आकडेवारी त्यांनी आत्तापर्यंत किती कुणबींना सर्टिफिकेट दिली त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं नाही, ओबीसी समाजाच्या संदर्भात ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याबद्दलही त्यांनी कोणते भाष्य केले नाही आणि त्यामुळे राज्याच्या एका प्रमुख मंत्र्यांनी सभागृहात केलेले भाषण आहे की, ओबीसी समाजाला या- या गोष्टी न दिल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजचे केलेले भाषण हे वेळ काढूपणाचे आणि सभागृहातून कसेबसे आता आपण निघायचे आहे हा त्यांचा नेहमीच्या गोष्टींचा जो अॅप्रोच असतो तो त्यांच्या आजच्या भाषणात दिसला," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस