शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

शिंदेंकडून घोषणा, पण मराठ्यांसाठी विशेष अधिवेशन घेणं अशक्य? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:28 IST

मराठा आरक्षण प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.

Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात आक्रमक आंदोलन उभे राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आरक्षणाबाबत आश्वासन दिलं आहे. "मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता भासल्यास मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं जाईल," असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.  

"मराठा आरक्षणासंदर्भात २४ तारीख ही शेवटची तारीख होती आणि त्या आधीच सरकारने निर्णय घ्यावा यासंदर्भात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आता पुन्हा वेळ मारून घेण्याचा प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचे गाजर दाखवण्यात आलेलं आहे. जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर, विशेष अधिवेशन घेणे आणि धोरणात्मक निर्णय घेणे हे कायद्याने शक्य होणार नाही," असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा हल्लाबोल केला आहे.

"किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील, असं वाटलेलं"

सरकारकडून भ्रमनिरास झाल्याचं सांगताना जयंत पाटील म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात आज जो प्रस्ताव होता, त्यात इतर समाजाच्या आरक्षणाबद्दल कोणतेही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. जे वकील हाय कोर्टात होते तेच सुप्रीम कोर्टात होते त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षणाची आणि गायकवाड समितीची बाजू सरळ मांडली नाही हा जो त्यांनी उल्लेख केला तो धादांत खोटा आहे, कारण महाराष्ट्रात जे हायकोर्टात वकील होते तेच आमचे सरकार असताना सुप्रीम कोर्टात होते, त्याचबरोबर सरकारच्या वतीने आम्ही सरकारला काही मागण्या केल्या होत्या. आम्ही सर्वांनी भाषणांमध्ये मुद्दे मांडले होते त्याबद्दल न बोलता मागे अडीच तीन वर्षात ज्या काही सोयी, सवलती दिलेल्या, ज्या काही चालू आहेत, काही चालू नाहीत त्या सवलतींवर मुख्यमंत्र्यांनी बोलून वेळ मारून नेली. सरकारकडे काही ठोस नाही, हे त्यांच्या भाषणाचा टोन बघता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं पण, आम्ही शांतपणे त्यांचे भाषण ऐकलं कारण, उत्सुकता होती किमान शेवटी तरी आरक्षणाचा निर्णय ते घोषित करतील," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

"मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तर नाही"  

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत ओबीसींच्या अनेक योजनांसाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. "आज महाराष्ट्रात कुणबी समाजाचे ओबीसी व कुणबी सर्टिफिकेट देण्याचे प्रमाण जे आहे ते किती आहे ? त्याची आकडेवारी त्यांनी आत्तापर्यंत किती कुणबींना सर्टिफिकेट दिली त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं नाही, ओबीसी समाजाच्या संदर्भात ज्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्याबद्दलही त्यांनी कोणते भाष्य केले नाही आणि त्यामुळे राज्याच्या एका प्रमुख मंत्र्यांनी सभागृहात केलेले भाषण आहे की, ओबीसी समाजाला या- या गोष्टी न दिल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजचे केलेले भाषण हे वेळ काढूपणाचे आणि सभागृहातून कसेबसे आता आपण निघायचे आहे हा त्यांचा नेहमीच्या गोष्टींचा जो अॅप्रोच असतो तो त्यांच्या आजच्या भाषणात दिसला," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस