शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कर्ज योजनेची अंमलबजावणी थांबली; बेरोजगारांनी जायचे कोठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:07 IST

Nagpur : अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करता यावा, याकरिता राज्य सरकारने २०२३ मध्ये मुदत कर्ज योजना सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या अल्पसंख्याक कर्ज योजनेची अंमलबजावणी थांबली आहे. गेल्या वर्षभरापासून कर्जाचे अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी आर्थिक मदतीकरिता कोणाकडे जायचे, असा प्रश्न विचारला जात आहे.

अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करता यावा, याकरिता राज्य सरकारने २०२३ मध्ये मुदत कर्ज योजना सुरू केली. या योजनेची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अंमलबजावणी केली जात होती. अर्जदारांना २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद योजनेत आहे. परंतु, ऑक्टोबर-२०२४ पासून योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. बेरोजगार युवक कर्जाकरिता महामंडळ कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

महामंडळ शोभेची वस्तू बनले

अल्पसंख्याक समाजाचा आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी स्थापित महामंडळ आता शोभेची वस्तू बनले आहे. महामंडळाकडे रोजगारासाठी कोणतीच कर्ज योजना नाही. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाकरिता, एका योजनेत पाच लाख तर, दुसऱ्या योजनेत २० लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे, पण त्यातील जाचक अटी विद्यार्थ्यांना घाम फोडत आहेत. अटी शिथिल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

तीन हजार युवकांनाच लाभ

आतापर्यंत राज्यभरात केवळ तीन हजार बेरोजगार युवकांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यात नागपूर विभागातील १३० युवकांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारने योजनेच्या अंमलबजावणीला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

केवळ ३.५ लाख रुपये दिले

योजनेत २० लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद असताना नागपूर विभागातील लाभार्थ्यांना केवळ ३.५ लाख रुपयांपर्यंतच कर्ज अदा करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's minority loan scheme halted; unemployed youth face uncertainty.

Web Summary : Maharashtra's minority loan scheme, meant to aid unemployed youth, has stopped accepting applications since October 2024. The Maulana Azad Corporation, responsible for the scheme, has become ineffective. Only 3,000 youths statewide benefited, with limited funds disbursed in Nagpur.
टॅग्स :nagpurनागपूरMONEYपैसा