शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत विविध विकास कामे करणाऱ्या संस्थांना ...

ठळक मुद्देविकास कामे करणाऱ्या संस्थांना इशारालोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत विविध विकास कामे करणाऱ्या संस्थांना दिला.नागपूर शहरात सध्या विकास कामे जोरात सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरु असते. परंतु हे खोदकाम होत असताना महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या विषयावर महावितरण व मेट्रोमध्ये अनेकदा वादही होत असतात. यासंबंधात पत्रकारांनी ऊर्जामंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विविध विकास कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. खोदकाम करीत असताना संबंधित संस्थेने महावितरणला माहिती देणे आवश्यक आहे. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. मेट्रोला यासंबंधात दोन वेळा निर्देश सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासबंधात नव्याने निर्देश देण्यात येतील. यापुढे खोदकाम करताना भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हेच दाखल केले जातील, असे ते म्हणाले.यासोबतच वीज आहे परंतु फिडर बंद आहे, असे प्रकारही सुरू आहेत. याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतो. तेव्हा वीज असूनही फिडर बंद असेल तर संबंधित शाखा अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.१७८ ठिकाणी ६.८७ कोटीचे केबल क्षतिग्रस्तलोकमतने २९ आॅगस्ट रोजीच्या अंकात विकास कामांमुळे होत असलेल्या वीज नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. यात मार्च २०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणी ६.८७ कोटी रुपयाच्या वीज केबलचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यामध्ये वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.वीज चोरणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल होणारशहरात ११५१ गणेश मंडळांपैकी केवळ १०१ मंडळांनीच अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक पेंडॉलसाठी लागणारी वीज चोरी केली जाते. यावर उपाय म्हणून महावितरणने मंडळांसाठी अत्यल्प दरात वीज जोडणी देण्याची योजना सुरू केली आहे. इतके करूनही मंडळांकडून वीज चोरी केली जात असेल, तर महावितरण कारवाईसाठी सज्ज आहे. यासाठी भरारी पथक स्थापन केले असून ते कारवाई करतील. वीज चोरी पकडल्या गेल्यास गुन्हे दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आजही तुटले केबल, २० हजार ग्राहक अंधारातविकास कामांच्या खोदकामात वीज केबल तुटण्याचा प्रकार शुक्रवारीही सुरूहोता. मेट्रोतर्फे बिनाकी परिसरात करण्यात आलेल्या खोदकामात उप्पलवाडी सब स्टेशन येथून निघालेले ३३ केवी बिनाकी फिडरचे केबल तुटले. यामुळे जवळपास २० हजार ग्राहकांची वीज सहा तास गायब होती. केबल तुटल्यामुळे तांडापेठ, मुदलीयार ले-आऊट, लालगंज, दही बाजार, मंगळवारी येथील वीज ग्राहकांना फटका बसला. विशेष म्हणजे नागपूर मेट्रोने आतापर्यंत केबल तोडून वीज वितरण फेन्चाईजी एसएनडीएलचे ९० लाख रुपयचे नुकसान केले आहे. मेट्रोने अजूनपर्यंत भरपाई दिलेली नाही.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेmahavitaranमहावितरण