शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शंभर दिवसात खोक्या अनं बेताल वक्तव्य करणारे मंत्री पाहिले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 17:43 IST

Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुतीचे सरकार निवडून येताना मतांची चोरी करून निवडून आले आहे. वाढीव ७५ लाख मते कुठून आली याचे उत्तर अजून दिलेले नाही. सरकार शंभर दिवसांच्या कार्यकाळात खोक्या आणि बेताल वक्तव करणारे मंत्री आपण पाहिले. या शंभर दिवसात जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरसंघचालक, योगी आणि काही खासदार जनगणना नको म्हणाले होते. ‘जो जात की बात करेगा, उसे लात दुंगा’, असेही काही लोक म्हणाले होते. आता निर्णय घेतला पण सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्यादोन्ही पवार येतील, अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बऱ्याच चर्चा महाराष्ट्रभर आहे. यावर पूर्ण काही झाल्यावरच भाष्य करता येईल. आम्ही महाविकास आघाडी मधून लोकसभा विधानसभा निवडणुका लढलो आहोत. आम्ही सोबत आहोत. जी काही परिस्थिती पुढच्या काळात निर्माण होईल त्यावर भाष्य करता येईल. आज त्यावर भाष्य करता येणार नाही. जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्या, असा सूचक इशारा सपकाळ यांनी दिला. काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले. त्यानुसार आवश्यक बदल सुरू केले आहेत. हे संघटना वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्यावर अधिवेशन बोलवापहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. या मुद्यावर सरकारसोबत राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत झाला. देश एक आहे, हे दाखविण्यासाठी सरकारने अधिवेशन बोलवावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर