शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 17:37 IST

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास, सांगितलं कारण  

सुरभी शिरपूरकर 

नागपूरमनसे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या रोखठोक बोलल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यंदा त्यांच्या बोलण्यावरून सगळ्यांनाच हसू अनावर झालय. कारण त्यांनी एक असा मजेशीर किस्सा सांगितला जे ऐकून तुम्हालाही हसायला नक्कीच येणार.

ते झालं असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यासाठी रवाना होतील. मात्र राज ठाकरे हे नागपूरला विमानानं नं जाता ट्रेननं प्रवास करणार आहेत.  मुंबईत मनसेच्या पक्षांतर्गत बांधणी संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीत पत्रकारांशी चर्चा करताना आपल्या खास शैलीमध्ये काही सूचक विधान करताना नागपूरला ट्रेनने का जाणार या संदर्भात त्यांनी मजेशीर भाष्य केलं.

पत्रकारांनी विदर्भ दौऱ्यासंदर्भात विचारलं असता राज यांनी सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असे उत्तर दिले.  त्यानंतर एका पत्रकाराने तुम्ही नागपूरला ट्रेन ने का चालले असा प्रश्न विचारला असता त्यावर राज यांनी लगेच उत्तर दिलं. ते बोलले. मी काही पहिल्यांदा ट्रेनने जात न्हाईये. यापूर्वी जेव्हाही मी नागपूरला गेलो तेव्हा ट्रेननेच गेलोय. विमानाच्या वेळा या फारच पहाटेच्या आहेत. पहाटे 4 ला एअरपोर्टला पोहोचावं लागतं, एवढ्या सकाळी उठून कोण जाईल.. इतक्या सकाळी तिथं जाऊन काय करायचं, असा प्रतिप्रश्न राज यांनी  केला.  राज यांचा हा प्रश्न ऐकून उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही.

त्याच प्रमाणे राज यांनी नंतर जेटलॅग टाळण्यासाठी आपण रेल्वेत जात असल्याचं सांगितलं. राज उपरोधितपणे हे विधान करत असतानाच एका पत्रकाराला हे खरं वाटलं. राज यांनी हसतच नागपुरला कसला आलाय जेटलॅग असं म्हणत तिथून हसतच निघून गेले.

विदर्भ दौरा

राज ठाकरे हे 17 सप्टेंबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. 18 ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या दोन दिवसाच्या दौऱ्या ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि नंतर २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि 23 ला अमरावतीहून मुंबईकडे रवाना होतील.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भाचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय. महापालिका निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आपला झेंडा विदर्भात फडकविणार  का? राज ठाकरेंचा रोखठोकपणा विदर्भीयांना आवडेल का? हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरेल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेVidarbhaविदर्भnagpurनागपूरMNSमनसे