शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सिग्नलवर पैसेवसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा ‘हंटर’, १० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:41 IST

सीताबर्डी, गिट्टीखदानमध्ये पोलिसांची कारवाई

नागपूर : सिग्नलवर उभे राहून जबरदस्तीने पैसेवसुली करणाऱ्या तसेच लग्नसमारंभात जाऊन उपद्रव करत अक्षरशः खंडणी मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर अखेर पोलिसांनी कारवाईचा हंटर उगारला आहे. सीताबर्डी व गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अशा तृतीयपंथीयांवर कारवाई करत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही कालावधीतील तृतीयपंथीयांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे तृतीयपंथीयांमध्ये खळबळ उडाली असून, या आरोपींना तडीपार करण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कठोर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच त्यांनी असे करताना कुणी आढळल्यास तडीपार करण्याचा इशारादेखील दिला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला सोशल माध्यमांतून अलंकार टॉकीज शहरातील वाहतूक सिग्नलवर तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागत असल्याची बाब लक्षात आली.

पोलिसांनी लगेच चौकशी केली व आकांक्षा, मुस्कान, श्वेता, वैशाली, अम्मू हे तृतीयपंथी त्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे सर्व तृतीयपंथी भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळील अंबेनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात जाऊन शोध घेतला असता आकांक्षा, मुस्कान, श्वेता हे सापडले व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पाचही तृतीयपंथीयांविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, संतोष जाधव, भूषण झाडे, राशीद शेख, समीर शेख, अश्विन, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लग्नघरी जाऊन उपद्रव

दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत एका लग्नघरीदेखील तृतीयपंथीयांनी उपद्रव केला. नर्मदा कॉलनी येथील प्रशांत पाटील यांच्या घरी लग्न समारंभ असताना सोनू, छोटी, जान्हवी, डिंपल, परी हे पाच तृतीयपंथी तेथे पोहोचले व पैशांची मागणी करू लागले. घरातील प्रसंग लक्षात घेता त्यांना एक हजार रुपये देण्यात आले. मात्र, तरीदेखील ते परत जायला तयार नव्हते व त्यांनी ११ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर असभ्य वर्तन करण्याची धमकी दिली. यजमानांचे मित्र शशांक गट्टेवार यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

घाबरू नका, तक्रार करा

तृतीयपंथी विविध माध्यमांतून जनतेला त्रास देताना दिसून येतात. जर पैसे दिले नाही तर घाणेरडे अंगविक्षेप करत समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील करतात. त्यांना न घाबरता थेट पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर पोलिस ठाणे सुस्त का?

शहरातील इतरही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तृतीयपंथी सक्रिय आहेत. सध्या लग्नसमारंभ सुरू असून, तेथेदेखील जाऊन ते त्रास देत असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यांतून पुढाकार घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर