शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलवर पैसेवसुली करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा ‘हंटर’, १० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:41 IST

सीताबर्डी, गिट्टीखदानमध्ये पोलिसांची कारवाई

नागपूर : सिग्नलवर उभे राहून जबरदस्तीने पैसेवसुली करणाऱ्या तसेच लग्नसमारंभात जाऊन उपद्रव करत अक्षरशः खंडणी मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर अखेर पोलिसांनी कारवाईचा हंटर उगारला आहे. सीताबर्डी व गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अशा तृतीयपंथीयांवर कारवाई करत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही कालावधीतील तृतीयपंथीयांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे तृतीयपंथीयांमध्ये खळबळ उडाली असून, या आरोपींना तडीपार करण्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कठोर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. तसेच त्यांनी असे करताना कुणी आढळल्यास तडीपार करण्याचा इशारादेखील दिला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला सोशल माध्यमांतून अलंकार टॉकीज शहरातील वाहतूक सिग्नलवर तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागत असल्याची बाब लक्षात आली.

पोलिसांनी लगेच चौकशी केली व आकांक्षा, मुस्कान, श्वेता, वैशाली, अम्मू हे तृतीयपंथी त्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे सर्व तृतीयपंथी भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळील अंबेनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात जाऊन शोध घेतला असता आकांक्षा, मुस्कान, श्वेता हे सापडले व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पाचही तृतीयपंथीयांविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, संतोष जाधव, भूषण झाडे, राशीद शेख, समीर शेख, अश्विन, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लग्नघरी जाऊन उपद्रव

दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत एका लग्नघरीदेखील तृतीयपंथीयांनी उपद्रव केला. नर्मदा कॉलनी येथील प्रशांत पाटील यांच्या घरी लग्न समारंभ असताना सोनू, छोटी, जान्हवी, डिंपल, परी हे पाच तृतीयपंथी तेथे पोहोचले व पैशांची मागणी करू लागले. घरातील प्रसंग लक्षात घेता त्यांना एक हजार रुपये देण्यात आले. मात्र, तरीदेखील ते परत जायला तयार नव्हते व त्यांनी ११ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर असभ्य वर्तन करण्याची धमकी दिली. यजमानांचे मित्र शशांक गट्टेवार यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

घाबरू नका, तक्रार करा

तृतीयपंथी विविध माध्यमांतून जनतेला त्रास देताना दिसून येतात. जर पैसे दिले नाही तर घाणेरडे अंगविक्षेप करत समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नदेखील करतात. त्यांना न घाबरता थेट पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर पोलिस ठाणे सुस्त का?

शहरातील इतरही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तृतीयपंथी सक्रिय आहेत. सध्या लग्नसमारंभ सुरू असून, तेथेदेखील जाऊन ते त्रास देत असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यांतून पुढाकार घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर