शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

संसार मोडला.. रस्त्यावर आले आयुष्य; आगीत होरपळलेला संसार बघून बायाबापड्यांचा आक्रोश, किंचाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 11:53 IST

महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते.

नागपूर : परराज्यातून पोटापाण्यासाठी नागपुरात आले. रोजगाराचा कसाबसा जम बसल्याने मिळालेल्या चिरोट्यात स्वप्नांचा आशियाना बनविला. पै-पै जमवून वस्तू खरेदी केल्या. दोन पैसे गाठीला जोडले, थोडंथिडकं सोनं जमविले. पण सोमवारी लागलेल्या आगीत आयुष्यभर जमविलेले सर्वच गमविले. महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते.

हातावर आणणे अन् पाणावर खाणे असेच येथील लोकांचे आयुष्य. सोमवारी सकाळी घरकाम आटोपून वस्तीतील बायामाणसं रोजगारासाठी घराला कुलूप लावून निघून गेले. अशात १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. एक एक करता दहा ते बारा सिलिंडर फुटले. अख्ख्या वस्तीला आगीने कवेत घेतले. घराघरांत आगीचे लोट पसरले. घरात असलेले काही जण जिवाच्या भीतीने बाहेर पळत सुटले. बघता बघता आगीने सर्वच उद्ध्वस्त केले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण प्रत्येक कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच घराबाहेर पडलेले सर्वच वस्तीत धडकले. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर आपापल्या घराची अवस्था बघून आक्रोश, किंचाळ्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू थांबता थांबत नव्हते. या आगीत घरातील काही तर वाचले असेल, या आशेने शोधाशोध करू लागले. धान्य जळाले, भांडे वितळले, आगीने छतावरील टीन कोसळले. टीव्ही, फ्रीज, कुलर, आलमारी काहीच शाबूत राहिले नाही.

बायकोचं सोनं तरी सापडेल

बांधकामावर मजुरी करणारा शालिकराम पटेलचा आशियानाच आगीत होरपळला. पण हा मोठ्या अपेक्षेेने बायकोने जमा केलेले सोन्याचे दागिने राखेत शोधत बसला होता. वितळलेल्या दागिन्याचा काहीतरी अंश भेटेल या अपेक्षेने अख्खी राख उकरून काढली, पण हाती निराशा आली.

अंगावरचे कपडेच उरले

प्रशासनाने लोकांसाठी अन्न व पाण्याचा स्टॉल लावला होता. दोन प्लेटमध्ये चिमुकल्यांसाठी भात घेऊन हेमिन वर्मा आपल्या घरासमोर मुलांना भरवत बसली होती. घरात सर्वच काही होते, पण आगीत संपूर्ण नष्ट झाले. बस अंगावरचे कपडेच शिल्लक राहिले साहेब. १२ वर्षांत पै-पै जमविलेले क्षणात नष्ट झाले.

दप्तर, पुस्तकं, खेळणीही जळाल्या

सूरज नावाचा मुलगा चवथ्या वर्गात शिकतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने तो घरीच होता. या आगीत सूरजचे संपूर्ण घर जळाले. आग विझल्यानंतर सूरज व त्याचा मित्र पुस्तक, दप्तर, खेळणी शोधत होता. नागेश चव्हाणची एक मुलगी कॉलेजात शिकते. नागेश कामावर निघून गेला आणि मुलगी ही कॉलेजात गेली. ते दोघेही परतल्यानंतर घराची धूळधाण झाली होती. घरातील अन्नधान्य, भांडे, टिनाचे छत काहीच शिल्लक नव्हते.

 प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

श्रावण नागेश्वरचे या आगीत घर आणि नवीन कोरी गाडी जळली. आलमारीत ठेवलेल्या बायकोच्या सोन्याच्या बांगड्या आणि काही रोख आग विझल्यानंतर तो शोधण्यात धडपडत होता. पण सर्वच कोळसा झाले होते. त्याला काहीच गवसले नाही. सहासात वर्षांच्या संसाराची धूळधाण झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी 

आगीची माहिती मिळताच पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. 

पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा वापर 

आग विझविण्यासाठी परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने विहिरीवर दोन पंप लावले. पंपाच्या साहाय्याने अग्निशमन गाडीत पाणी भरून आगीवर पाण्याचा मारा केला, तसेच पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला.

..तर अनेकांचे जीव गेले असते!

सकाळी १० नंतर सिलिंडरचा स्फोट झाला आणि एकानंतर एक स्फोट सुरू झाले. वेळीच सगळे सतर्क झाल्याने धावपळ करून एकमेकांचे जीव वाचवले, अन्यथा अनेकांचे जीव गेले असते. 

टॅग्स :SocialसामाजिकfireआगnagpurनागपूरAccidentअपघातCylinderगॅस सिलेंडर