शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
5
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
6
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

भजन, संगीतामुळे मानवाचे जीवन प्रभावशाली

By admin | Updated: June 20, 2016 02:51 IST

भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो.

नितीन गडकरी : ‘अर्पितो गुरुवंदना’ सीडीचा लोकार्पण समारंभनागपूर : भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. त्यामुळे भजन, संगीताचा प्रभाव माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर पडून त्याचे जीवन प्रभावशाली होते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबागतर्फे संतकवी कमलासुत रचित ‘अर्पितो गुरुवंदना’ सिडीच्या लोकार्पण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सिने संगीतकार नंदू होनप, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, शिक्षक आमदार ना. गो. गाणार, सामाजिक कार्यकर्ता रवी पुट्टेवार उपस्थित होते. गडकरी म्हणाले, चंद्रशेखर वराडपांडे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. लोक मंदिराचे घर करतात, परंतु त्यांनी घराचे मंदिर केले. त्यांचे दर्शन झाल्यावर गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचा भास होत असे. ईश्वराची भक्ती करताना शोषित, पीडित, अंध, अपंगांची सेवा करताना मोठा आनंद मिळतो. कमलासुतांचे जीवन गजाननमय झाले होते. त्यांनी सातत्याने भक्तगणांना प्रेरणा दिली. त्यांच्या जीवनात संवेदनशीलता, भक्ती होती. त्यामुळे माणुस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराधा पौडवाल यांनी गजानन महाराज,संतकवी कमलासुतांवर श्रद्धा असल्याचे सांगून सीडी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिने संगीतकार नंदू होनप म्हणाले, कमलासुतांसारखे गुरु लाभण्यासाठी भाग्य लागते. सद्गुरुच्या कार्यात आत्मिक समाधान असते. गजानन महाराजांवरील सिडी ऐकण्याची नसून अनुभवण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश वराडपांडे यांनी चंद्रशेखर वराडपांडे ऊर्फ संतकवी कमलासुत यांच्या आठवणींना उजाळा दिला. आभार डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला गजानन महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंदिर परिसर स्वच्छ असावाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदेशातील मंदिरांचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याचे सांगून तेथील मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय चांगले असतात. परंतु भारतात मंदिराचा परिसर अस्वच्छ असतो. रस्ते व्यवस्थित नसतात. त्यामुळे प्रत्येक गावातील मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्व धर्माच्या नागरिकांची तीर्थस्थळे जोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात येत असल्याचे सांगून २५ हजार कोटी रुपये खर्च करून विविध धार्मिक स्थळांकडे जाणारा पालखी मार्ग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.