शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मेंदू, हृदयात पाणी किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:33 IST

पंच महाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवाच्या निर्मितीत पाण्याचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक धर्मग्रंथात पाण्याचा विशेष उल्लेख केला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेले पाण्याचे दुर्भिक्ष, भारतच नाही तर संपूर्ण जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या लक्षात घेता, रमण विज्ञान केंद्राने ‘जल हेच जीवनाचा आधार’ हे सिद्ध करणारी वॉटर गॅलरी तयार केली आहे. अतिशय रंजक पद्धतीने या गॅलरीत पाण्याचे महत्त्व विशद केले आहे.

ठळक मुद्देजाणून घ्या रमणच्या वॉटर गॅलरीत : संत्र्याला ५० तर नारळाला २५०० लिटर लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंच महाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवाच्या निर्मितीत पाण्याचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक धर्मग्रंथात पाण्याचा विशेष उल्लेख केला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेले पाण्याचे दुर्भिक्ष, भारतच नाही तर संपूर्ण जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या लक्षात घेता, रमण विज्ञान केंद्राने ‘जल हेच जीवनाचा आधार’ हे सिद्ध करणारी वॉटर गॅलरी तयार केली आहे. अतिशय रंजक पद्धतीने या गॅलरीत पाण्याचे महत्त्व विशद केले आहे.केंद्राच्या परिसरात ३००० चौरस फुटामध्ये ३० मॉडेलच्या माध्यमातून शरीरातील पाण्यापासून जमिनीतील पाण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. गॅलरीच्या प्रवेशद्वारावरच विविध धर्मग्रंथात पाण्याबद्दल लिहिण्यात आलेली महती आहे. पृथ्वीची प्रतिकृती साकारून त्यात असलेले पाणी आणि होत असलेला उपसा याची भीषणता दाखविली आहे. ‘वॉटर इन युवर बॉडी’ या मॉडेलमध्ये आपले वजन आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण बघायला मिळते. त्याचबरोबर मानवाच्या अवयवात जसे मेंदू, हृदय, किडनी, हाड यात किती पाणी आहे आणि त्याचे वजन किती हे बघायला मिळते. ‘वॉटर आॅन अर्थ’ हे मॉडेलच्या माध्यमातून १०० टक्के पाण्यापैकी ३ टक्केच पाणी वापरण्यायोग्य आहे. परंतु त्यातूनही मानवाला केवळ १ टक्काच पाणी मिळत असल्याचे तांत्रिक पद्धतीने सांगण्यात आले आहे. मानवाच्या उत्पत्तीनंतर समाज कुठे वसला. त्याची कारणे कोणती होती, याची माहिती मिळते. पाऊस कसा पडतो, नदीचा प्रवास चलचित्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतो आहे.पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागते. आपण खातो ती फळे, भाजीपाला, द्रवपदार्थ, यासाठी किती पाणी लागते याबाबतची अभ्यासपूर्ण माहिती या वॉटर गॅलरीतील विविध मॉडेल व चार्ट्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यात प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीत पाण्याचे प्रमाण दाखविले आहे. पाण्यापासून होणारे आजार, पाण्यामुळे झालेला विनाश, पाण्याच्या संवर्धनाची माहिती, पाण्याची गुणवत्ता तपासणी लॅब, वॉटर ट्रीटमेंट प्लॅण्टमध्ये होणारे काम, प्लास्टिकमुळे झालेले वॉटप पोल्यूशन, भूगर्भातील पाण्याची गोष्ट, वेगवेगळ्या देशात पाण्याची पातळी याची माहिती येथे मिळते. सर्वात शेवटी पाण्याच्या संवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.जगात पाण्याची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. भरमसाठ उपशामुळे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत आहे. तरीही लोक पाणी जपून वापरत नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याच्या आणि पाणी बचतीचे महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात वॉटर गॅलरी उभारण्यात आली आहे.मनोजकुमार पांडा, क्युरेटर, रमण विज्ञान केंद्र 

 

टॅग्स :Raman Science Centreरमण विज्ञान केंद्रnagpurनागपूर