शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘आब नही तो कब नही’ : अन्यायग्रस्त आदिवासींचा विधान भवनावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:29 IST

राष्ट्रीय आदिम कृती समितीने हजारोंच्या संख्येने विधान भवनावर विराट मोर्चा काढला. ‘आब नही त कब नही’चा नारा देत आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्दे ४० वर्षांपासून अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांची हक्काची लढाई अनुसूचित जमातीतील अर्जदारांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे : मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : मागील ४० वर्षांपासून अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजपर्यंत त्यांना आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. भाजप सरकारने सत्तेवर आल्यास त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासींनी मतदान करून भाजपला सत्तेत बसविले. परंतु तीन वर्षे होऊनही भाजप सरकारने अन्यायग्रस्त आदिवासींच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने हजारोंच्या संख्येने विधान भवनावर विराट मोर्चा काढला. ‘आब नही त कब नही’चा नारा देत आपला आवाज बुलंद केला. पुढील आठवड्यात अन्यायग्रस्त आदिवासींच्या प्रश्नांबाबत बैठक बोलविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.हलबा, हलबी, माना, गोवारी, कोळी, धोबा, धनगर, छत्री, ठाकूर, मन्नेवारलु आदी ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींना आजपर्यंत राजकीय पक्षांकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. भाजप सरकारनेही सत्तेवर आल्यानंतर अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरले. त्यामुळे संतप्त अन्यायग्रस्त आदिवासींनी हजारोंच्या संख्येने विधान भवनावर धडक दिली. अनुसूचित जमातीतील अर्जदारांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, प्रमाणपत्रासाठी कमीतकमी कागदपत्र म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जातीची नोंद, प्रतिज्ञापत्र, १५ वर्षाचा अधिवास पुरावा यांची निश्चिती करावी, राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणात आणाव्या, वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाची कालमर्यादा निश्चित करावी, आदी मागण्या अन्यायग्रस्त आदिवासींनी रेटून धरल्या. मोर्चात आदिमच्या नेत्या अ‍ॅड नंदा पराते यांनी ही लढाई येथेच थांबणार नसून न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे मत व्यक्त केले. आमदार विकास कुंभारे यांनी वर्षभरात अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय न मिळाल्यास आमदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मन्नेवार आदिवासी समाजाच्या लक्ष्मी हजारे, राजू धकाते, विश्वनाथ आसई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आमदार विकास कुंभारे, अ‍ॅड. नंदा पराते, विश्वनाथ आसई, धनंजय धापोडकर, दे. बा. नांदकर, प्रवीण भिसीकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनोहर घोराटकर, रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अन्यायग्रस्त आदिवासींच्या प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलावण्याचे तसेच नोकरीतून कुणालाही न काढण्याचे आणि आदिवासींच्या वैधता प्रमाणपत्रासाठी जीआर काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मंत्री जानकर, खासदार महात्मे मोर्चाबाहेरअन्यायग्रस्त आदिवासींच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे मोर्चास्थळी आले होते. खासदार विकास महात्मे यांनी अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तर मंत्री महादेव जानकर यांनी अन्यायग्रस्त आदिवासींना भावनिक मुद्दा न करता कायद्याने लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले. येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत तुम्हाला न्याय मिळेल, असे शब्द त्यांनी उच्चारताच संतप्त मोर्चेकऱ्यांनी त्यांना गप्प राहण्यास सांगून त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. मंत्री महोदयांना मोर्चाबाहेर काढा, असा एकच कल्लोळ झाला. मोर्चेकऱ्यांच्या संतप्त भावना पाहून दोघांनीही मोर्चातून काढता पाय घेतला.पोलिसांनी घेतली होती धास्तीअन्यायग्रस्त आदिवासींचा विराट मोर्चा पाहून पोलिसांनीही या मोर्चाची धास्ती घेतली होती. जवळपास १५० सशस्त्र आणि साधे पोलीस मोर्चास्थळी तैनात करण्यात आले होते. परंतु मोर्चातील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी भेटून आल्यानंतर शांततेच्या मार्गाने हा मोर्चा परत घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांची मोर्चेकऱ्यांशी हुज्जतबाजीहजारोंच्या संख्येने आलेले अन्यायग्रस्त आदिवासी शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभागी झाले होते. परंतु टेकडी मार्गावर एका पोलीस तुकडीची कमान सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक नीलेश उरकुडे हे मोर्चेकऱ्यांशी उर्मटपणे व्यवहार करून हुज्जत घालत होते. ते मोर्चेकऱ्यांना मोर्चास्थळी जाण्यास मज्जाव घालत असल्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर