शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

तलावांची कशी करणार दुरुस्ती

By admin | Updated: August 6, 2015 02:52 IST

शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण ..

नागपूर : शासनाकडून प्राप्त होणारा निधी व सेस फंडातील तरतुदीतून जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, मामा तलाव, पाझर तलाव, साठवण व कोल्हापुरी बंधाऱ्यांची देखभाल व दुरूस्तीची कामे केली जात होती. परंतु प्रशासनाने हा निधी जलयुक्त शिवारकडे वळविला आहे. त्यामुळे तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे कशी करणार, असा प्रश्न बुधवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी ५ ते ६ कोटी व सेस फंडातील २ कोटी असा ७ ते ८ कोटीचा निधी उपलब्ध असायचा. परंतु हा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वळविण्यात आला आहे. या योजनेसाठी ३११ गावांची निवड करण्यात आली आहे. याच गावात सिंचन योजना राबविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव , ५६ पाझर तलाव, ७ पाझर तलाव, ३९ गाव तलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. पाट दुरुस्ती व गेट दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्ती न झाल्याने तलाव व बंधाऱ्यांची सिंचन क्षमता कमी झाली आहे. परंतु निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत.कुही तालुक्यातील ८५ मामा तलावांची दुरुस्तीचा मुद्दा सदस्य मनोज तितरमारे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील परिस्थिती अशीच आहे. पाट व गेट दुरुस्ती नसल्याने तलाव व बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. व पं.स. सदस्य, पदाधिकारी यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी सदस्यानी केली. हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचे निर्देश अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिले.मामा तलाव मासेमारीसाठी लिजवर देण्यात आले आहे. परंतु यात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. आसलवाडा, चिखली व सेलू या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेतले जात आहे. शिंगाड्यावर जंतुनाषकाची फवारणी केली जाते. यामुळे तलावाचे पाणी दूषित झाल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच तलावाच्या पाण्यात कपडे धुणाऱ्या महिलांना विविध आजारांना सामोरे जावर लागत आहे. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी तितरमारे, विनोद पाटील यांनी केली.पारशिवनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करताना सदस्य कमलाकर मेंघर यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न जयकमुार वर्मा यांनी उपस्थित केला. पाणलोट क्षेत्रातील विकास कामे राबविताना दिरंगाई केल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)