शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

 नागपुरातील ५५ हजार लोकांचे पुनर्वसन कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 12:07 PM

Nagpur News नागपुरातील नाग नदीच्या काठावरील २९ झोपडपट्ट्यांतील ५५ हजार लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही योजना नसताना नाग नदीचे पुनरुज्जीवन कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्दे पुनर्वसन स्थळाचा ठावठिकाणा नाहीनाग नदी पुनरुज्जीवन

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाग नदीचे गतवैभव प्राप्त व्हावे, प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, अशी शहरातील सर्वच नागरिकांची इच्छा आहे. केंद्र सरकारने २११७.७९ कोटींच्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रकल्प राबविताना नाग नदीच्या काठावर १५ मीटरपर्यंत ‘नो डेव्हलपमेंट झोन’ घोषित करावे लागेल. अर्थातच नदीकाठावरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय हा प्रकल्प राबविता येणार नाही. नाग नदीच्या काठावरील २९ झोपडपट्ट्यांतील ५५ हजार लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही योजना नसताना नाग नदीचे पुनरुज्जीवन कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नदीकाठावरील २९ झोपडपट्ट्यांत ९७१८ घरे असून, येथील लोकसंख्या ५५ हजार २१० इतकी आहे. पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना नदीच्या दोन्ही बाजूचे १५ मीटरपर्यंतचे पात्र मोकळे असणे आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पात्रालगतची जागा मोकळी होणार नाही. यातील २२ झोपडपट्ट्या १९७१ ते १९९२ सालात वसलेल्या आहेत. कायद्याने या झोपडपट्ट्यांना संरक्षण प्राप्त आहे. सात झोपडपट्ट्या १९९२ सालानंतरच्या आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्यांनाही हटविणे शक्य नाही.

नाग नदीचा गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकास प्रस्तावित आहे. परंतु, नदी किनाऱ्यावरील सार्वजनिक वापराच्या जागा, क्रीडांगण व निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या जागांवर या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत तसेच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती आहेत. त्यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पुनरुज्जीवन करताना नदीपात्रात सोडण्यात येणारे सिवरेज, सांडपाणी बंद करणे आवश्यक आहे तसेच नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार थांबला पाहिजे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.७१ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १३२३.५१ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३८ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिका (जापान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) कडून १८६४.३ कोटी रुपये अर्थसाहाय्य घेणार आहे.

.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी