शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जी गोष्ट हातात नाही ती मुख्यमंत्र्यांनी कबुल कशी केली? नाना पटोले यांचा सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: November 17, 2023 19:21 IST

Nana Patole : महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे.

- कमलेश वानखेडे  नागपूर - महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे. कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांनी ते कसे कबूल केले, असा सवाल करीत मराठा आणि ओबीसी मध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ओबीसी आणि मराठा वादामुळे राज्यातील इतर प्रश्न मागे पडत आहे. अशी स्थिती इंग्रजांच्या काळात होती. गृहमंत्री यांच्या मुळे लाठीचार्ज आणि त्यावरील वक्तव्य या मुळे स्थिती बिघडली. ओबीसी आपले आरक्षण टिकविण्यासाठी लढत आहेत. तर जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागण्यासाठी लढत आहेत. सर्व जातीचे सर्वेक्षण होण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. जातीनिहाय जनगणना हाच यावर एकमेव मार्ग आहे. दोन्ही समाजासाठी पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सरकार अहंकारामध्ये आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक चुकीचे दर्शन देशाला दाखवण्याचा काम चाललं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन आम्ही वंदन करतो. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व होत. त्यांचा विचार आणि आवाज आजही घुमतो आहे. इंदिरा गांधी यांना भेटायला बाळासाहेब ठाकरे गेले होते. तेंव्हा बाळासाहेबांनी आमोरासमोर प्रामाणिक मिका मांडली. ते क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याकाळात धार्मिक पक्ष बंद करण्याचे निर्णय घेतला होता. बाळासाहेब यांच्या भूमिकेनंतर इंदिरा गांधी यांनी निर्णय बदलला होता, असेही पटोले यांनी सांगितले.

लोकसभेचा फार्म्युला ठरला नाहीलोकसभेच्या जागावाटपावर कुठलाही निर्णय झाला नाही. पाच राज्यांच्या निकालानंतर तीनही पक्ष सोबत बसून निर्णय घेतील. अजून फॉर्म्युला ठरला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे टाईमपास मंत्रिमंडळहे टाईमपास मंत्रिमंडळ आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीला १२ मंत्री अनुपस्थित राहत असतील महाराष्ट्राचे नुकसानच आहे. आधीच १७ जागा रिकाम्या आहेत. भाजप समोर जेव्हा पराभव दिसतो तेव्हा त्यांना देव आठवतो. कर्नाटक मध्ये हनुमानाचा सहारा घेतला पण तिथे पराभव झाला. राम सत्यासोबत असतो अस्त्यासोबत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण