शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जी गोष्ट हातात नाही ती मुख्यमंत्र्यांनी कबुल कशी केली? नाना पटोले यांचा सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: November 17, 2023 19:21 IST

Nana Patole : महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे.

- कमलेश वानखेडे  नागपूर - महाराष्ट्रात जाती जातीत वाद निर्माण करण्याचा भाजप काम करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन हे सगळ्यांच्या जीवावर बेतत आहे. जी गोष्ट हातात नाही ते मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत कबूल केले आहे. कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांनी ते कसे कबूल केले, असा सवाल करीत मराठा आणि ओबीसी मध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, ओबीसी आणि मराठा वादामुळे राज्यातील इतर प्रश्न मागे पडत आहे. अशी स्थिती इंग्रजांच्या काळात होती. गृहमंत्री यांच्या मुळे लाठीचार्ज आणि त्यावरील वक्तव्य या मुळे स्थिती बिघडली. ओबीसी आपले आरक्षण टिकविण्यासाठी लढत आहेत. तर जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागण्यासाठी लढत आहेत. सर्व जातीचे सर्वेक्षण होण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. जातीनिहाय जनगणना हाच यावर एकमेव मार्ग आहे. दोन्ही समाजासाठी पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सरकार अहंकारामध्ये आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक चुकीचे दर्शन देशाला दाखवण्याचा काम चाललं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन आम्ही वंदन करतो. बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व होत. त्यांचा विचार आणि आवाज आजही घुमतो आहे. इंदिरा गांधी यांना भेटायला बाळासाहेब ठाकरे गेले होते. तेंव्हा बाळासाहेबांनी आमोरासमोर प्रामाणिक मिका मांडली. ते क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याकाळात धार्मिक पक्ष बंद करण्याचे निर्णय घेतला होता. बाळासाहेब यांच्या भूमिकेनंतर इंदिरा गांधी यांनी निर्णय बदलला होता, असेही पटोले यांनी सांगितले.

लोकसभेचा फार्म्युला ठरला नाहीलोकसभेच्या जागावाटपावर कुठलाही निर्णय झाला नाही. पाच राज्यांच्या निकालानंतर तीनही पक्ष सोबत बसून निर्णय घेतील. अजून फॉर्म्युला ठरला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे टाईमपास मंत्रिमंडळहे टाईमपास मंत्रिमंडळ आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीला १२ मंत्री अनुपस्थित राहत असतील महाराष्ट्राचे नुकसानच आहे. आधीच १७ जागा रिकाम्या आहेत. भाजप समोर जेव्हा पराभव दिसतो तेव्हा त्यांना देव आठवतो. कर्नाटक मध्ये हनुमानाचा सहारा घेतला पण तिथे पराभव झाला. राम सत्यासोबत असतो अस्त्यासोबत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण