शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत काडतुसे रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात गेले कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:37 IST

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक, सहायक सुरक्षा आयुक्तांकडून विचारपूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.सोमवारी १८ मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील मेन्टेनन्स विभागाच्या बैठक खोलीत खर्ड्याच्या तीन बॉक्समध्ये ९ एम.एम.चे ९८ जिवंत काडतुसे आढळले. येथील कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (३७) रा. मानकापूर, सादिकाबाद हा खोली साफ करत असताना त्याला हे जिवंत काडतुसे मिळाले होते. या घटनेची माहिती त्याने वरिष्ठांना दिली. लगेच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सिनिअर सेक्शन इंजिनिअर धनंजय काणे यांनीही लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधला. माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मोगरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आढळलेली काडतुसे हेतुपरस्सर कुणीतरी लपवून ठेवली असून संधी मिळाल्यानंतर तो ती घेऊन गेला असता, अशी चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.सात काडतूस अद्यापही गायब२१ नोव्हेंबर २०१८ रोजी इंडो-तिबेट सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे निवडणूक विशेष रेल्वेने जात असताना धावपळीत त्यांचे ९ एम.एम.चे ५६९ काडतूस विसरले होते. त्यापैकी ४६४ काडतूस लोहमार्ग पोलिसांनी परत केले. त्यानंतर सोमवारी ९८ काडतुसे सापडले. परंतु अद्यापही ७ काडतुसे गायब आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर