शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

जलजीवनची सहाशे कामे मग हजार गावांत टंचाई कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:25 IST

योजनांची कामे संथ : जिल्ह्यात १३०४ कामे झाली होती मंजूर, कोण लक्ष देणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या १३०४ मंजूर योजनांपैकी ६०० कामे पूर्ण झाल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला आहे. दुसरीकडे पाणीटंचाई आराखड्यात एक हजार ६६ गावांचा समावेश आहे. टंचाई निवारणासाठी ३७ कोटी ४९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्याने जलजीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे निवारण व्हावे, यासाठी दरवर्षी आराखडा तयार केला जातो. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यातील एक हजार ६६ गावांतील उपाययोजना विभागाकडून प्रस्तावित आहेत. त्यासाठी ३७ कोटी ४९ लाख २१ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टंचाई आराखडा ११ कोटींनी वाढविला आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून हर घर नलची कामे सुरू असताना टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे.

बिल थकल्याने योजना थंडावलीशासनाकडून ३१ मार्चपर्यंत थकीत बिले अदा केली जातात, असा अनुभव आहे. मात्र, यंदा पैसे न आल्याने ठेकेदारांची निराशा झाली आहे. आठ-दहा महिन्यांपासून बिले मिळालेली नाही. त्यामुळे उसनवारी करून आणली देणी, कामगारांना मजुरी कशी द्यावी, असाही प्रश्न ठेकेदारांपुढे उभा झाला आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर होणार आहे.

मार्च संपला, पण निधी मिळाला नाही

  • प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २०० कोटींची कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. मात्र, अनेक ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.
  • यासाठी ९० कोटींची गरज असताना मार्चअखेरीस फक्त २ दहा कोटींचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे. अजूनही सुमारे ८० कोटींची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. त्यात दहा कोटींतील रक्कम काही ठरावीक कंत्राटदारांनाच देण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.

कामे झालेल्या हिंगण्यात लागणार टँकरहिंगणा तालुक्यात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहेत. दुसरीकडे या तालुक्यात टंचाई निवारणासाठी या तालुक्यात सर्वाधिक टैंकर प्रस्तावित आहे. जिल्ह्यात टँकरवर जवळपास तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तर नळ योजनांच्या दुरुस्तीवर २० कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. नळयोजनांची कामे जलजीवनच्या माध्यमातूनही केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक