शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सुदृढ व्यक्तीच्या घराला घोषित केले प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 01:08 IST

कोरोना संसर्गाबाबत मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. राजनगर निवासी ३५ वर्षीय एक व्यक्ती ५ ऑगस्टला कोरोना संक्रमित झाले आणि आता ते पूर्णत: दुरुस्त झाले आहे. मात्र, संक्रमणाच्या २० दिवसानंतर मनपाला संबंधित व्यक्तीचे घर प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे सुचले. त्या व्यक्तीच्या घरापुढे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर टांगण्यात आले.

ठळक मुद्देमनपाची बेजबाबदारी : संक्रमणाच्या २० दिवसानंतर लावले बॅनर २४ तासानंतर बॅनर काढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाबाबत मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. राजनगर निवासी ३५ वर्षीय एक व्यक्ती ५ ऑगस्टला कोरोना संक्रमित झाले आणि आता ते पूर्णत: दुरुस्त झाले आहे. मात्र, संक्रमणाच्या २० दिवसानंतर मनपाला संबंधित व्यक्तीचे घर प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे सुचले. त्या व्यक्तीच्या घरापुढे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर टांगण्यात आले. मनपा मंगळवारी झोनला याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार कृत्याने संबंधित व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत व्हावे लागले. बॅनर लागताच शेजारपाजारच्या लोकांमध्ये त्यांच्याविषयीची वागणूकही बदलली आहे. दूध, भाजीपाला, फळवाले त्यांच्या घराजवळ भटकतही नाहीत. मनपामुळे त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तणावाचा सामना करावा लागत आहे. ही भरपाई कोण करेल, हा प्रश्न आहे.मनपा प्रशासनाच्या बेजबाबदारीची अनेक प्रकरणे सातत्याने पुढे येत असतात. त्याच शृंखलेत आता या प्रकरणाने कोरोना संदर्भात मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे.राजनगर येथील एका इमारतीत राहणाºया ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट ५ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. मनपाद्वारे त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यात कोणतीच लक्षणे आढळून न आल्याने, त्यांना एक दिवसानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले. दुसºया दिवशी त्यांच्या कुटुंबीयांचेही नमुने तपासण्यात आले. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नियमानुसार दहा दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णाला स्वस्थ घोषित करण्याचे आयसीएमआरने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या रुग्णांला दहा दिवसानंतर तपासण्यास मनपाकडून कुणीच आले नाही. सजगता म्हणून त्यांनी स्वत:च तपासणी करवून घेतली. यावेळी त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांच्या जिवात जीव आला. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार धोरणामुळे मनपाचे कोरोना संदर्भातील कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.संक्रमिताचा कुणीच नाही विचारला हालहवाल होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आरोग्याची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी मनपाची एक टीम आहे. मात्र, राजनगरमधील या संक्रमित व्यक्तीला बघण्यासाठी मनपाकडून कुणीच आले नाही. विना तपासणी सात दिवसानंतर संबंधित रुग्ण स्वस्थ झाल्याचे मनपाकडून घोषितही करण्यात आले.घोळ कुठे झाला, याची चौकशी करतो - राऊतमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना प्रतिबंध लावणे व काढण्याचे अधिकार दिले आहेत. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत आहेत. या संदर्भात त्यांना ‘लोकमत’ने विचारणा केली असता, त्यांनी इंजिनिअर्सच्या बदल्या होत असल्याचे सांगितले. त्यामुळेच, यादी उशिरा मिळाली असल्याने हा घोळ झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले. चूक नक्कीच झाली. मात्र, घोळ कुठे झाला याची चौकशी करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर